📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 11, 2026
काय चाललयं अवतीभवती

आपटे वाचन मंदिरचा साहित्यकृती पुरस्कार वितरण सोहळा २७ जून रोजी इचलकरंजीत Excellent Literary Awards 2025 Ichalkaraji

Apte Vachan Mandir and Ichalkaranji Sahitya Sammelan Smruti Trust will honour distinguished writers with Excellent Literary Awards 2025 on June 27 in Ichalkaranji.

इचलकरंजी : येथील आपटे वाचन मंदिर आणि इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट यांच्यावतीने संयुक्त विद्यमाने ‘उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार २०२५’ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवारी, २७ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता आपटे वाचन मंदिराच्या बजाज सभागृहात (राजवाडा चौक, इचलकरंजी) होणार आहे.

यंदाच्या पुरस्कारांमध्ये कविता, गद्य, कथा, कादंबरी, बालसाहित्य, अनुवादित साहित्य, स्थानिक साहित्य आणि वाचन संस्कृती आदी विविध विभागांतील उल्लेखनीय साहित्यकृतींचा गौरव करण्यात येणार आहे.

पुरस्कारप्राप्त साहित्यकृती व मानकरी असे :

इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार – जुई कुलकर्णी (पुणे) यांना ‘तुझ्याकडे येणाऱ्या कविता’ या काव्यसंग्रहासाठी.
उत्कृष्ट गद्य साहित्यकृती पुरस्कार – संतोष नागो शिंदे (पुणे) यांना ‘पटयारा’ या पुस्तकासाठी.
लक्षणीय पद्य साहित्यकृती पुरस्कार – जितेंद्र कुंवर (नाशिक) यांना ‘झाडाची कविता’ या पुस्तकासाठी तसेच अरविंद भामरे (धुळे) यांना ‘शापित कोलाहलाच्या नोंदी’ या पुस्तकासाठी.
लक्षणीय गद्य साहित्यकृती पुरस्कार – रविंद्र बेडकिहाळ (फलटण) यांना ‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर – कर्तृत्वाचा एक शोध’ या ग्रंथासाठी आणि डॉ. सिसिलिया कार्व्हालो (वसई) यांना ‘प्रसादचिन्हे’ या पुस्तकासाठी.
सौ. आशाताई सौंदत्तीकर उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार – क्षितिज देसाई (ठाणे) यांना ‘शीतपेटीतून जेव्हा जाग येते…’ या कथासंग्रहासाठी.
विनायकराव श्रीधर देशपांडे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार – अभय इनामदार (पुणे) यांना ‘भूछत्र’ या कादंबरीसाठी.
महादेव बाळकृष्ण जाधव उत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती पुरस्कार – पद्मजा मेहेंदळे (पुणे) यांना ‘सोबत सांजवेळची’ या पुस्तकासाठी.
वसुंधरा मुकुंद अर्जुनवाडकर उत्कृष्ट ललित गद्य साहित्यकृती पुरस्कार – ‘वानोळा’ या पुस्तकासाठी मा. नरेंद्र पाठक (ठाणे).
पार्वती शंकरराव तेलीसिंगे उत्कृष्ट बाल साहित्यकृती पुरस्कार – ‘मायरा आणि देवराईचे गुपित’ (भाग १ व २) या पुस्तकासाठी मा. मालविका देखणे (नागपूर).
रागिणी दादासो जगदाळे ‘स्मृत्यर्थ युवा पथदर्शी पुरस्कार’ – ‘जिते जे गुंतले’ या पुस्तकासाठी मा. नयन पहाड (अमरावती).
मुकुंद कुलकर्णी स्मृत्यर्थ उत्कृष्ट स्थानिक परिसर साहित्य पुरस्कार – बापू तारळेकर (इचलकरंजी) यांना.
उत्कृष्ट वाचक पुरस्कार – सुनील शेठे (इचलकरंजी).

पुरस्कार वितरण समारंभासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे व डॉ. अशोकराव सौंदत्तीकर हे आहेत.

Related posts

ग्रामगीतेचे जनजागरण करणारी मांगलगावच्या पालखीची मंगलमय परंपरा

समतेच्या विचाराचे छत्रपती संभाजी महाराज यांचे ग्रंथ जनमानसात पोहचविले पाहिजेत – डॉ. बालाजी जाधव

क्रूझ पर्यटन क्षेत्रात 10 पट वाढण्याची क्षमता: जहाजबांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406