काय चाललयं अवतीभवती

मातोश्री रेखा गुरव वाङ्मय पुरस्कार जाहीर

कोल्हापूर – कोनवडे (ता. भुदरगड ) येथील गुरव परिवाराच्यावतीने मातोश्री रेखा गुरव वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. यंदा देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा रवींद्र गुरव, राजेंद्र गुरव यांच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच या पुरस्कारांचे वितरण एक जुन रोजी कोनवडे येथील शाहू प्रबोधिनी स्कूलमध्ये होणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक कृष्णात खोत, तर अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी गोविंद पाटील असणार आहेत. तसेच डॉ. चंद्रशेखर कांबळे व राजन कोनवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

साहित्यव्रती पुरस्कार फलटण येथील सुरेश शिंदे यांना देण्यात येणार आहे. उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार कपिलेश्वर येथील पांडुरंग मुरारी पाटील यांच्या नागरमुठी या कादंबरीस, तर उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार वाशिम येथील गजानन शिले यांच्या थकीत एकूण गोषवारा या काव्यसंग्रहास, तर उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार झुरळ आणि इतर काहीबाही या भंडारा येथील प्रमोदकुमार अणेराव यांच्या कथासंग्रहास देण्यात येणार आहे. तसेच विशेष पुरस्कार साजंडच्या लेखिका सुचित घोरपडे यांना देण्यात येणार आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

16 minutes ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

13 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

18 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago