📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 30, 2026
काय चाललयं अवतीभवती

लेखकाची सांस्कृतिक सत्ता राजकीय सत्तेपेक्षा श्रेष्ठ असते – डॉ. रणधीर शिंदे Rekha Gurav State Literary Awards Ceremony

Dr. Randhir Shinde said that the cultural power of writers is superior to political power during the Matoshri Rekha Dinkar Gurav State Literary Awards ceremony.

कूरः लेखकाची सांस्कृतिक सत्ता ही कोणत्याही प्रकारच्या राजकीय सत्तेपेक्षा श्रेष्ठ असते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी केले.

कोनवडे येथील मातोश्री रेखा दिनकर गुरव राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक राजन कोनवडेकर, मौनी विद्यापीठ गारगोटीचे प्रा. डॉ. युवराज देवाळे, सुप्रसिद्ध कवी प्रा. डॉ. चंद्रशेखर कांबळे (राधानगरी), प्रकाशक दादासाहेब जगदाळे (इचलकरंजी) हे प्रमुख उपस्थित होते. हा कार्यक्रम राजर्षी शाहू करिअर प्रबोधनीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

डॉ. शिंदे म्हणाले, मातोश्री रेखा दिनकर गुरव साहित्य पुरस्कारांमुळे महाराष्ट्रातील सशक्त व बळकट शब्दांचा गौरव झाला आहे. चांगले साहित्यिक व साहित्यकृतींचा सन्मान होतोय याचा मनोमन आनंद होत आहे. यावेळी साहित्यिक रविंद्र गुरव यांनी साहित्य पुरस्कारांचा आढावा घेतला.

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. इंद्रजित भालेराव (परभणी) यांना शाल, सन्मानचिन्ह व रोख १० हजार रुपये असा मानाचा साहित्यव्रती पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय विविध साहित्यप्रकारांतील उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ते असे,

‘पीळ’ या कादंबरीसाठी दिवाकर कृष्ण आचार्य (अकोला) यांना उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार,
‘चित्रक’ या काव्यसंग्रहासाठी श्रीकांत ढेरंगे (पुणे) यांना उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार,
‘काठावरच्या चेहऱ्यांच्या कथा’ या कथासंग्रहासाठी सूरज चौगले (सांगली) यांना उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार,
तर ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ या कवितासंग्रहासाठी प्रतिभा खैरनार (नाशिक) यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सर्वाना डॉ. रणधीर शिंदे यांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाल, सन्मानचिन्ह व पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी प्रा. इंद्रजित भालेराव, श्रीकांत ढरंगे, दिवाकर आचार्य यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुरव, रेखा गुरव, साहित्यिक मारुती मांगोरे, विश्वास पाटील, दत्तात्रय कांबळे, प्रकाश शिंदे, टी. डी. पाटील, विलास पाटील, टी. एल. शिंदे, बी. एस. पाटील, शिवाजी पाटील, ज. रा. पाटील, शिवाजी लोकरे, कपील पाटील, रघुनाथ मोरे यांच्यासह साहित्य क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन कवी संजय खोचारे यांनी तर आभार सचिन पाटील यांनी मानले.

Related posts

नवी मुंबई साहित्य रसिक संस्थेतर्फे काव्य पुरस्कार योजनेचे आयोजन

पिलाजीराव सणस यांच्या स्वराज रथासमोर सादर मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके

मसापच्या दामाजीनगर शाखेचे पुरस्कार जाहीर

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!