मुक्त संवाद

हृषीकेश: द सेलिब्रिटी

जीवनाकडे पाहण्याची अत्यंत व्यापक दृष्टी म्हणुन. शेती वाचवा, गावाकडे चला, वसुंधरा वाचवा, पर्यावरण वाचवा असे आपण नेहमी म्हणत असतो. मात्र त्याचा नेमका अर्थ यातूनच व्यक्त होतो आहे. म्हणुनच हृषीकेश माझ्यासाठी सेलिब्रिटी आहे.

राजन इंदुलकर

हृषीकेश: द सेलिब्रिटी असे सेलिब्रिटी हल्ली अभावानेच भेटतील. किंबहुना फारसे नसतीलच.
म्हणुनच काल संध्याकाळी हृषिकेश पहिल्यांदाच घरी आला आणि तो निघताना त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह मला झाला. मल्हारकडून त्याच्याबद्दल आधी ऐकले होते. या तासभराच्या भेटीने ते ‘ऐकीव’ मनात कोरले गेले.

पुण्यातील सधन, सुखवस्तू कुटूंबातील हा तरुण पाच वर्षापूर्वी कोकणातील एका गावात राहायला आला. त्यापूर्वी त्याने अहमदाबाद ते जम्मू अशी २५ दिवसांची सायकल यात्रा केली होती. या प्रवासातून त्याला आत्मभान आणि समाजभानाचा आविष्कार झाला असावा.

तो संख्याशास्त्रातील पदवीधर आहे. वाचन आणि लेखन हा त्याचा मुख्य छंद आहे. एक दोन पुस्तके लिहिली आहेत, लिहीत आहे. साधी राहणी, उच्च विचारसरणी ही त्याची जीवनशैली आहे.
मुख्य म्हणजे तो स्वतःच्या चरितार्थासाठी लोकांकडे मजुरीची कामे करतो. सध्या येथिल गावातून अशा अकुशल कामाच्या मजुरीचा दर ४०० रूपये आहे. ज्यात तो आपला खर्च भागवतो.
खरं तर आपल्याकडे थोडे फार शिकल्यावर शहरात जाऊन पांढरपेशी चरितार्थ करणे हीच जन-रीत आहे.

मजुरी, शारीरिक अंगमेहनत अशी कामे अगदी नाईलाज म्हणुन किंवा नशिबी आलंय म्हणुनच केली जातात. अशी मजुरीची कामे करणारा वर्ग समाजातील शेवटचा, अशिक्षित, पीडित, उपेक्षित, अत्यंत गरीब असा घटक मानला जातो.

अशी अंगमेहनत करावी लागणाऱ्या पालकांच्या मुलांना, तुमचे आई-बाप त्यांचे दुर्भाग्य म्हणुन अशी कामे करीत आहेत. तुम्ही तसे न करता, शिकून मोठे व्हा… (म्हणजे मजुरी न करता पांढरपेशी कामे करा) असे पदोपदी सांगितले जाते.

अगदीच झाले तर स्वतःच्या जमिनीत, व्यवसायात अंगमेहनत करणे हे लोकांना समजू शकते.
पण गावातील शेतकऱ्यांकडे जाऊन बांध बंदस्ती, लाकूड फाटा, भात लावणी अशी मजुरीची कामे चरितार्थ म्हणुन जाणीव पूर्वक स्वीकारणे, तेही असंख्य पांढरपेशी पर्याय खुले असताना…
याला निव्वळ वेडेपणाच म्हणता येईल.

खरं तर अशा वेडेपणांची आज नितांत गरज आहे. चाकोरीबद्ध विचार करणाऱ्यांना हे पटणार नाही.
मला मात्र हा वेडेपणा म्हणजे मानवी जीवन शैलीतील अनमोल असा अपारंपारिक ऊर्जा-स्त्रोत वाटतो. जीवनाकडे पाहण्याची अत्यंत व्यापक दृष्टी म्हणुन. शेती वाचवा, गावाकडे चला, वसुंधरा वाचवा, पर्यावरण वाचवा असे आपण नेहमी म्हणत असतो. मात्र त्याचा नेमका अर्थ यातूनच व्यक्त होतो आहे. म्हणुनच हृषीकेश माझ्यासाठी सेलिब्रिटी आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

2 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

15 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

20 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago