काय चाललयं अवतीभवती

साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे मसापचे आवाहन

पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदच्यावतीने दरवर्षी मराठी राजभाषा दिनानिमित्त काही विशेष पुरस्कार दिले जातात. सन २०२२ च्या या विविध पुरस्कारांसाठी प्रकाशित पुस्तकांच्या २ प्रती पाठवण्याचे आवाहन मसापच्यावतीने करण्यात आले आहे. यंदाच्यावर्षी विनोदी साहित्य, व्यक्तिचित्रविषयक, ललीत, इतिहास आदी विभागातील पुस्तकांसाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत.

सन २०२० वा २०२१ या दोन वर्षात प्रकाशित पुस्तकांसाठी असे पुरस्कार –

१.कै. चिं. वि. जोशी पुरस्कारः- विनोदी साहित्याच्या पुस्तकासाठी.

२.कै.विद्याधर पुंडलिक पुरस्कारः- व्यक्तिचित्रविषयक पुस्तकासाठी. 

सन २०२१या वर्षात प्रकाशित पुस्तकांसाठीः-

१.कै. निर्मला मोने पुरस्कारः- ललित लेखांच्या पुस्तकासाठी.

२.कै. रा. श्री जोग पुरस्कारः- समीक्षा लेखांच्या पुस्तकासाठी.

 ३.कै. सुहासिनी इर्लेकर पुरस्कारः- नवोदित कवीच्या पहिल्या कवितासंग्रहासाठी.

 ४.कै. शं. ना. जोशी पुरस्कारः- सामाजिक/ सांस्कृतिक/वैचारिक लेखांच्या पुस्तकासाठी.

 ५.कै.द.वा.पोतदार पुरस्कारः- इतिहासविषयक पुस्तकासाठी.

६.कै.कवी यशवंत पुरस्कारः- उत्कृष्ट कवितासंग्रहासाठी.

या सर्व पुरस्कारांसाठी लेखक व प्रकाशकांनी १२ जानेवारी 2022 पुस्तकांच्या २ प्रती कार्यवाह-(विशेष पारितोषिके) महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, सदाशिव पेठ, पुणे-४११०३०. दूरध्वनी क्रमांकः०२०-२४४७५९६३. या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन मसापच्यावतीने करण्यात आले आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

4 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

5 hours ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

18 hours ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

1 day ago

शेतकऱ्याचं जगणं, मरणं आणि मरणानंतरची परवड सांगणारं नाटक : ‘कर्जबळी’

शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळत नाही, कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही आणि अखेर आत्महत्येचा…

1 day ago

महात्मा फुले विचार आणि कार्य या विषयावर दीर्घ काव्य स्पर्धा Mahatma Phule Thoughts and Work Poem Competition

राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे आयोजनस्पर्धेसाठी कविता पाठविण्याची अंतिम तारीख :…

2 days ago