Vilas Kulkarni Poem Papani
ओलावते कधी पापणी
तेंव्हाच मोहरते लेखणी
हे सुख की दुःख सांगते
शब्दांची निवड देखणी
होते कधी तरी भारवाही
अखंड वाहे अमृत वाहिनी
सुख असो की दुःख तिला
खारटच असते तरी पाणी
क्षणात उघडे क्षणात मिटते
होकारच घेतो मग समजुनी
अल्लड अवखळ पापणी
वेडीच ठरते खुळी दिवाणी
नयन उघडता गुज सांगते
धीट कधीतरी होते पापणी
सांगताना मध्ये अडखळते
साखरेची मग होते पेरणी
देवयानी तू यावी जीवनी
देवाकडे ही एकच मागणी
तिचेच नाम ओठावर घेवून
मिटेल अखेर माझी पापणी
कवी – विलास कुलकर्णी
मीरा रोड
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…
हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…
विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…