Vilas Kulkarni Poem Papani
ओलावते कधी पापणी
तेंव्हाच मोहरते लेखणी
हे सुख की दुःख सांगते
शब्दांची निवड देखणी
होते कधी तरी भारवाही
अखंड वाहे अमृत वाहिनी
सुख असो की दुःख तिला
खारटच असते तरी पाणी
क्षणात उघडे क्षणात मिटते
होकारच घेतो मग समजुनी
अल्लड अवखळ पापणी
वेडीच ठरते खुळी दिवाणी
नयन उघडता गुज सांगते
धीट कधीतरी होते पापणी
सांगताना मध्ये अडखळते
साखरेची मग होते पेरणी
देवयानी तू यावी जीवनी
देवाकडे ही एकच मागणी
तिचेच नाम ओठावर घेवून
मिटेल अखेर माझी पापणी
कवी – विलास कुलकर्णी
मीरा रोड
स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…
फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…
https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…
शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळत नाही, कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही आणि अखेर आत्महत्येचा…
राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे आयोजनस्पर्धेसाठी कविता पाठविण्याची अंतिम तारीख :…