shripad-bhalchandra-joshi-poem-on-mahatma-gandhi
एक चष्मा एक दृष्टी
दोन पावले अजून चालती
एक काठी फक्त गाठी
न उगारता आधारासाठी
घेत पोटाशी जगभरचा द्वेष
अजूनही फिरतो देश,
देश आग विझवतो
नजरेने प्रेमाच्याच
पुनः पुन्हा तोच
ठरवताहेत विखारी जगभर
गुन्हा मोडून झाला तोडून झाला
मारून झाला मरून झाला
चष्मा त्याचा पळवून झाला
मिटवून झाल्या स्मृती तरी
त्याच्याच जगभर कशा
गातात श्रृती
कळायला असावे लागते
फक्त एक मोकळे हृदय ए
क मोकळा श्वास सोडून
वृत्ती ज्याचा त्याचा घेण्याचा घास
महात्म्याकडे बघून माणसा
फक्त एकदा प्रसन्न हास
कवी – श्रीपाद भालचंद्र जोशी
जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…
दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…
आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…
बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…
कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…