snakebite-in-animals Care and Remedies
साप म्हटलं की मनात एक प्रकारची भीती निर्माण होते. आपल्या हिंदु संस्कृतीमध्ये सापाला देव मानतात. त्याची नागपंचमीला पुजा करतात. तसेच साप शेतकऱ्यांचा मित्र म्हणून नैसर्गिक संतुलन साधण्याचे कार्य करतो. शेतकऱ्यांना शेतात काम करताना किंवा त्यांच्या जनावरांना अनेकदा सर्पदंश होण्याची शक्यता असते. साप अनेक प्रकारचे असून त्यापैकी फक्त विषारी सापाच्या दंशामुळे मृत्यू होतो. या संदर्भात प्रबोधन करणारा लेख…
डॉ. बी. सी. घुमरे, मो.नं. ७७०९५११७४१
सहाय्यक प्राध्यापक
डॉ. विकास व्ही. कारंडे मो.नं. ९४२०००३२३
सहाय्यक प्राध्यापक
पशुवैदयाकिय औषधशास्त्र व विषशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील, पशुवैदयकिय महाविदयालय,
शिरवळ, ता.खंडाळा, जि.सातारा
जगात 2500 पेक्षा जास्त जाती आहेत. त्यापैकी फक्त 1/3 साप विषारी आहेत. 1. नाग, 2. मण्यार, 3. घोणस, 4. फुरसे, 5. नागराज इत्यादी विषारी जातींचा समावेश होतो.
1. साप दुध पितो: हे खरे नाही कारण सापाचे मुख्य खाद्य उंदीर, बेडुक व पक्षांची अंडी, टोळ, मासे पाल इत्यादी आहेत. महत्वाचे म्हणजे साप हा प्राणी मांसाहारी आहे.
2. सापाला ऐकु येते: सापाला कान नसतात. त्यामुळे त्यांना ऐकू येण्याचा प्रश्नच नाही. सापाला विभागलेल्या जिभेच्या सहायाने ध्वनीकंपनाची जाणीव होत असते. सापवाल्याच्या पुंगीच्या हालचालीनुसार सराप हालचाल करत असतो.
3. साप खुन्नस धरतो: सापाच्या मेंदुची संपुर्ण वाढ होत नसल्यामुळे साप हुशार नसतो. त्यामुळे तो मृत्यूपर्यंत खुन्नस धरतो हे चुकीचे आहे व तसे फक्त सिनेमातुनच दाखविले जाते.
1. पाठीवरील खवले लहान असतात.
2. पोटावरील खवले लाबट असतात ते पुर्ण लांबीपर्यंत असतात.
3. डोक्यावरील खवले लहान असतात.
4. उदा. धामण, अजगर, आंधळा, पाणसाप सर्पटोली व गवत्या साप
1. फणा काढण्याची क्षमता असते. फण्यावर 10 असा आकडा असतो.
2. मानेवर 2 ते 3 पट्टे असतात.
3. घोणस सापाचे तोंड इंग्रजी व्ही शब्दाच्या आकाराचे असते.
4. विषारी सापाची उदाहरणे नाग, नागराज, घोणस.
हे प्रथमोपचार मानवाला सर्पदंश झाल्यास पण करावेत.
उपचार पॉल्हिॅलंट ॲटोस्नेक व्हेनम सिरम हे इंजेक्शन शिरेतुन जनावरांच्या वजनाप्रमाणे द्यावे
याप्रमाणे सर्पदंशावर प्रथमोपचार व उपचार करुन घेतल्यास सर्पदंशामुळे जनावरांतील मृत्यूचे प्रमाणे कमी होईल.
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…