आजकाल तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. मग तिला काय म्हणायचे ? तेव्हा मला वाटते बाईला तुम्ही कुमारीका, सवाष्ण, विधवा वगैरे न मानता एक बाई किंवा एक माणूस म्हणून बघा. दोघांमधले कुणी आधी जायचे हे कुणाच्या हातात नसते.

सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी

नवरात्र संपले. या सणात सवाष्ण जेवायला बोलावणे आणि तिची ओटी भरणे वगैरेला खूप महत्त्व असते. असते असे नाही आपण ते प्रस्थ माजवतो. खरे तर ही एका स्त्री शक्तीची पुजा आहे. मग एकीला पुजतांना दुसरीला डावलून कसे चालेल. आणि स्वतः एक स्त्री असून स्त्रिच्या मनातल्या भावना कशा समजून घेता येत नाही. आज हे आठवले कारण कालपर्यंत जिला सगळे विधवा समजून टाळत होत्या त्याच बायका आता तिने पुन्हा लग्न केले म्हणून तिला लगेच ओटी भरायला बोलवतात. खरे तर ती एकदा विधवा झाली होती ना ? तर काही जण विचारात पण पडले की आता नक्की तिला काय समजायचे खरेच जर लग्न झाल्यावर बाई सवाष्ण होते म्हणजे सौभाग्यवती होते असे आपण मानतो तर मग तिचा नवरा जरी गेला तरी ती तर लग्न झालेलीच असते ना. पुन्हा कुमारीका तर होत नाही ना ?

बरे मग जर एखादीचा घटस्फोट झाला असेल तर काय करणार ? तिचे सुध्दा लग्न झालेलेच आहे. शिवाय नवरा पण जिवंत आहे. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती विधवा पण नाही. मग तिला सवाष्ण म्हणून बोलवाल का ? तर नाही. तुमच्या नियमात तर ती बसते आहे ना…एकूण काय तर सगळे तुमच्या मानण्यावर हे अवलंबून आहे.

आजकाल तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. मग तिला काय म्हणायचे ? तेव्हा मला वाटते बाईला तुम्ही कुमारीका, सवाष्ण, विधवा वगैरे न मानता एक बाई किंवा एक माणूस म्हणून बघा. दोघांमधले कुणी आधी जायचे हे कुणाच्या हातात नसते. कुणीतरी एक जण आधी आणि एक नंतर जाणार असतो. खरे तर कुठल्याही बाईला आपण नवर्‍याच्या आधीच जाण्याची इच्छा असते. कारण जो मागे उरतो त्याला एकटे राहून आयुष्य काढणे खूप अवघड असते. एकमेकांची सवय झालेली असते.

खरे तर नवरा गेल्यावर सुध्दा ती समर्थपणे रडत न बसता मुलांना वाढवते. बाई गेली तरी त्या पुरुषाला जर सगळे पुजा विधी सण समारंभात कुणी अरे त्याच्या हातून चालणार नाही असे म्हणत नाही. उलट कमरेला सुपारी खोचून तो सर्व धार्मिक विधी करू शकतो. तर मग स्त्रिला असे वेगळे नियम असण्याची काय गरज आहे ? नवर्‍याच्या मागे ती सासु सासरे मुल बाळे सगळे समर्थपणे सांभाळते. तेव्हा तिचे विधवा असणे कुणाला जाचत नाही. मग सणासमारंभात तिने पुढाकार घेऊन केलेले का चालू नये ? ते पण चालायला हवेच.

कर्तव्य करतांना ती मुलासारखी मानता मग मान देतांना का नाही ? तर असे हे आपले असते. आपण नियम आपल्याला हवे तसे कायद्यातल्या पळवाटे प्रमाणे वापरतो. खरे तर सौभाग्य व ती यांची नेहमीच चुकामूक होते आहे आजही. तिचे असणे हेच सौभाग्याचे नाही का ? आपण सुधारक असल्याचा नुसता आव आणतो आणि आपल्या सोयीनुसार ते पाळतो. पण खरे तर ती नेहमीच सौभाग्यवती आहे अगदी जन्मल्यापासून मरेपर्यंत..

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

3 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

16 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

20 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago