Tanaji Dhane – Farmer Poet of Pain and Hope | Nangarto Talhatyachya Resha Poetry
तानाजी धरणे एक सृजनशील शेतकऱ्यांच्या वेदना घेऊन जगणारा कवी…त्यांच्या काव्यप्रांतातील कवितेची आरोळी फार मोठी आहे. अवतीभोवतीच्या जगाला कवेत सामावून घेण्याची क्षणता त्यांच्या काव्यात आहे. कविचं मन हळवं असतं हे खरं आहे. धरणेच्या कविता अशाच समाजातील वेदनेला साद घालतात.
बाबाराव मडावी, आकांतकर
दूर कोणत्या महाली असेल तुझा मुक्काम
ही झोपडी बापाची तिची वाढव शान।
चंद्रमौळी झोपडीत तुझे सपान बिल्लोरी
तुझ्या जन्माचे आठव माझे पोसलेत उरी।
हे अंगण रुसलं तू जाता गं सासरी
नाही होणार सडा-रांगोळी नाही बजणार बासरी।
ती तुळस बघ नाही हसणार कालच्यावाणी
वाट बघल आई तिच्या लोचनात पाणी।
सण येता राखी पुनवचा दादा घेईल ग साडी
तुझ्यासाठी असेल ती त्याच्या काळजाची घडी।
वाट मोकळी दिसल तव्हा हंबरतील गायी
तिच्या पाडसात तुला रोज पाहते तुझी आई।
लेक चालते सासरी बाप रडतो धाई धाई
या कठोर पहाडाची होते क्षणातच राई।
तानाजी धरणे, महाड, रायगड
काव्यसंग्रह – नांगरतो तळहाताच्या रेषा
कवी – तानाजी धरणे
प्रकाशक – ज्ञानसिंधु प्रकाशन नाशिक 2024
किंमत – १५० रुपये
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…
हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…
विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…