📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 20, 2026
काय चाललयं अवतीभवती

निर्मला मठपती फाऊंडेशनतर्फे राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कारासाठी आवाहन Mathapati Marathi Literature Award

Nirmala Mathpati Foundation, Solapur, has announced the State-Level Best Literary Creation Awards 2026 for novels, essay collections and children's literature.

सोलापूर : मराठी साहित्यविश्वातील ज्येष्ठ लेखिकाकवयित्री कै. निर्मला मठपती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ निर्मला मठपती फाऊंडेशन, सोलापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार २०२६ देण्यात येणार आहेत, अशी माहिती फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. शिवांजली स्वामी यांनी दिली आहे. या पुरस्काराचे हे सहावे वर्ष असून, दरवर्षी विविध साहित्यप्रकारांतील उल्लेखनीय साहित्यकृतींचा गौरव केला जातो.

यंदा कादंबरी, ललितलेख संग्रह आणि बालकथासंग्रह/बालकादंबरी या तीन साहित्यप्रकारांसाठी प्रत्येकी एक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्यकृतींचा विचार पुरस्कारासाठी करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे असून, पुरस्कार वितरण समारंभ ऑक्टोबर २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

पुरस्कारासाठी इच्छुक साहित्यिकांनी आपल्या कादंबरी, ललितलेख संग्रह, बालकथासंग्रह अथवा बालकादंबरीच्या प्रत्येकी दोन प्रती, स्वतःचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि अल्प परिचय पाठवावे. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ अशी आहे.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
यु. बी. मठपती
ब्लॉक क्र. १४, कनिष्क नगर,
जुळे सोलापूर, सोलापूर – ४१३००४.
मोबाईल : ९८८१२१६६४८

Related posts

पेटीएम बँकेच्या ‘कर्मा’नेच त्यांना उध्वस्त केले !

समकालीन साहित्यास्वादमध्ये आस्वादक समीक्षेच्या पलीकडे जाणारे लेखन – डॉ. रणधीर शिंदे

सीमावादात अडकलेला राेजीराेटीचा सवाल…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!