Include Tanjore Maratha History in School Textbooks: Sujata Bhide-Chapekar at Book Launch
सुचेता भिडे-चापेकर : ‘तंजावर साम्राज्यातील मराठा राजांचे योगदान’चे प्रकाशन
पुणे : महाराष्ट्राबाहेर मराठी भाषा,संस्कृती आणि स्वराज्याची परंपरा जपणाऱ्या तंजावरच्या मराठा साम्राज्याचा इतिहास इयत्ता सातवी-आठवीच्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केला पाहिजे,असे मत ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांनी व्यक्त केले.
तंजावरचे युवराज सरफोजी राजे भोसले लिखित Contribution of Tanjore Maratha Kings या इंग्रजी पुस्तकाचा प्रा. डॉ. मनोहर इंगळे यांनी मराठीत अनुवाद केलेल्या ‘तंजावर साम्राज्यातील मराठा राजांचे योगदान’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष श्रीमंत युवराज जयसिंह राजे भोसले,तंजावरचे युवराज प्रतापसिंह सरफोजी राजे भोसले, प्रा.डॉ.मनोहर इंगळे आदी उपस्थित होते.
भिडे-चापेकर म्हणाल्या, तंजावरमधील मराठा राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या सीमाबाहेर मराठी भाषा,संस्कृती,कला आणि ज्ञानपरंपरेचा विकास केला. हा वैभवशाली इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सातवी-आठवीच्या मराठी व इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये त्याचा समावेश होणे आवश्यक आहे. शालेय वयातच विद्यार्थ्यांना या ऐतिहासिक वारशाची ओळख करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.
युवराज प्रतापसिंह सरफोजी राजे भोसले यांनी मोडी लिपीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी केली.यासंदर्भात आपण मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठा साम्राज्य आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक महत्त्वाची कागदपत्रे, सनदा आणि ऐतिहासिक संदर्भ मोडी लिपीमध्ये उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
नाशिकः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक येथे अधिष्ठाता (डीन) पदावर कार्यरत असलेल्या डॉ. वेंकट शाहुबाई अर्जुनराव…
महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीसाठी लागू केलेल्या नव्या ६०:२०:२० मूल्यांकन पद्धतीत शैक्षणिक गुणांना विद्यापीठाच्या…
तूं मन हें मीचि करी । माझां भजनी प्रेम धरीं ।सर्वत्र नमस्कारीं । मज एकातें…
गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ बाह्य गुरूंना वंदन करण्याचा दिवस नाही; तर आपल्या अंतर्याम्यातील विवेकगुरूचा आवाज ऐकण्याचाही…
भारतीयत्वाचा पुढील अध्याय सत्ता किंवा सीमांवर लिहिला जाणार नाही; तो ज्ञानाच्या मुक्त प्रवाहावर लिहिला जाईल.…
साहित्य हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजमन घडवणारी,संस्कृती जपणारी आणि विचारांना दिशा देणारी सर्जनशील शक्ती…