काय चाललयं अवतीभवती

कवीने अनुभवाच्या मातीतूनच आपला आवाज शोधला पाहिजे! – डॉ राजेंद्र मुंढे

० दुसरे राज्यस्तरीय कवी संमेलन उत्साहात;४५ कवींचा सहभाग,
० वर्ध्यात शब्दांचा रंगमंच सजला;‘प्रबोधिनी कविरत्न पुरस्कार–२०२६’ ० सोहळ्यात काव्यप्रतिभेचा गौरव

वर्धा : बहुविधतेतही एक धागा समान असला पाहिजे—कवितेची प्रामाणिकता. कवीने आपल्या काळापासून पळून जाऊ नये. आपल्या सभोवतालचे दुःख, आनंद, संघर्ष, विसंगती, प्रेम, निसर्ग, राजकारण, बाजार, तंत्रज्ञान, बदलते नाते आणि बदलता माणूस—या सगळ्याकडे त्याने स्वतःच्या संवेदनशील नजरेने पाहिले पाहिजे. कविता वास्तवाची केवळ नोंद नसते; ती वास्तवाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न असते. म्हणूनच कवितेच्या गर्दीत हरवू नका; स्वतःचा आवाज शोधा. कवीने आपल्या अनुभवाच्या मातीतूनच आपला आवाज शोधला पाहिजे,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक डॉ . राजेंद्र मुंढे यांनी केले .

प्रबोधिनी प्रेरणा फाऊंडेशन, प्रबोधिनी मंच व महाराष्ट्र साहित्य समूह यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. संत गाडगेबाबा स्मारक व सभागृह, कृष्णनगर, वर्धा येथे या भव्य साहित्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. डॉ राजेंद्र मुंढे या संमेलनाच्या अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते .

साहित्य, काव्य आणि सामाजिक जाणिवांचा सुरेख संगम घडविणारे दुसरे राज्यस्तरीय कवी संमेलन व ‘प्रबोधिनी कविरत्न पुरस्कार–२०२६’ सोहळा रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी वर्धा येथे उत्साहपूर्ण आणि साहित्यिक वातावरणात पार पडला. या दुसर्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक तसेच विदर्भ साहित्य संघ, वर्धा शाखेचे अध्यक्ष राजेंद्र मुंढे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषद वर्धाचे अध्यक्ष सुधीर पांगुळ, माजी स्किल डेव्हलपमेंट अँकर सुरेश गणराज, ज्येष्ठ कविवर्य भालचंद्र डंभे, सामाजिक कार्यकर्त्या अर्चना भोमले, ॲड. मृणालिनी रागीट, प्रबोधिनी प्रेरणा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत रामटेके, प्रबोधिनी मंचच्या सचिव रंजना आटे तसेच ॲड. विठ्ठल लोणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय मार्गदर्शनातून राजेंद्र मुंढे यांनी काव्य व साहित्याची सामाजिक भूमिका अधोरेखित केली. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजातील संवेदना, प्रश्न आणि परिवर्तनाची जाणीव व्यक्त करणारे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगून साहित्याच्या माध्यमातून समाजाशी नाते दृढ करण्याचा सदोदित प्रयत्न साहित्यिकांनी करत राहिले पाहिजे ,भरकटलेल्या समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे काम साहित्य करीत असते, असेही डॉ मुंढे यांनी सांगितले .

कवितांच्या सादरीकरणाने रंगला साहित्यिक दरबार

संमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागांतून सहभागी झालेल्या कवी-कवयित्रींनी आपल्या दर्जेदार कविता सादर करत रसिकांची दाद मिळविली. अमरावती, वाशिम, मोर्शी, आरमोरी, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, लातूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर आणि वर्धा आदी जिल्ह्यांतील साहित्यिक व कवींच्या सहभागामुळे संमेलनाला व्यापक राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झाले.

विजया वसंत लेवटे, पुष्पा दिलीप अतकरे, डॉ. किरण प्रभाकर वाघमारे, वृषाली दिनेश चोरे, सुनिता तागवान, अनिल अमरसिंग जाधव, सुनंदा मधुकर अंभोरे, आरती महेंद्र गायकवाड, मंदाताई सुरेश वाघमारे, चंदू डोंगरवार, डॉ. किरणताई नामदेवराव मोरे-चव्हाण, रोहित बन्सोड, रवि ताकसांडे, संतोष ग्यानीराम मेश्राम, क्षितिजा बापट, गंगाधर शालिग्राम धुवाधपारे यांच्यासह अनेक कवी-कवयित्रींनी कविता सादर केल्या.

तसेच भंडारा, नागपूर व वर्धा जिल्ह्यातील उषा शिलवंत घोडेस्वार, मंगला डहाके, मेघा भांडारकर, कविता कठाणे, हर्षा उद्धव भुरे, प्रा. जयश्री प्रकाश वाघ, राधिका कैलास तितीरमारे, उषाताई राऊत, शुभांगी कपिल डांगरे, हर्षा हरीश वाघमारे, प्राजक्ता नितीन वऱ्होकर, कोकिळा सुनील खोदनकर, मुकेश मुकिंद वानखेडे, डॉ. ज्योती जे. नागपूरकर, मनिषा गुरनुले, जिजा प्रदीप मानकर, अरुणा भास्कर भोंडे, डॉ. राजेश चंद्रकांत काळे, सुचिता गोपाळराव कुनघटकर, निलेश वासुदेव गणगे, प्रीती वानखेडे, सरला अजय कापसे, नैना सचिन ठाकरे, निलिमा शंकर मोहमारे, ॲड. विठ्ठलराव लोणकर आणि सुरेश लक्ष्मण सुरजुसे आदींनीही सहभाग नोंदविला.

कविता सादरीकरणासोबत सहभागी कवी-कवयित्रींचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या साहित्यिक योगदानाला व्यासपीठ देत प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.प्रास्ताविक रंजना आटे यांनी केले. सूत्रसंचालन रवी ताकसांडे व हर्षा भुरे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार ॲड. विठ्ठल लोणकर यांनी मानले.

या संपूर्ण साहित्य सोहळ्याचे मुख्य आयोजन प्रबोधिनी प्रेरणा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत ताराचंद रामटेके आणि प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूहाच्या संस्थापिका अध्यक्षा नम्रता प्रशांत रामटेके यांच्या पुढाकारातून करण्यात आले. कार्यक्रमाच्या नियोजनात सचिव रंजना आटे व ॲड. विठ्ठल लोणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विविध जिल्ह्यांतून आलेल्या कवी-कवयित्रींच्या उपस्थितीने आणि दर्जेदार कविता सादरीकरणाने वर्ध्यातील हा साहित्यिक सोहळा संस्मरणीय ठरला. नवोदित आणि प्रस्थापित साहित्यिकांना एकत्र आणत काव्यप्रतिभेला व्यासपीठ देणारा ‘प्रबोधिनी कविरत्न पुरस्कार–२०२६’ उपक्रम साहित्यविश्वात सकारात्मक पाऊल ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

सिंधुदुर्गाचा निसर्ग अन् साहित्यिक वारसा प्रेरणादायी : डॉ. श्रीपाद जोशी Sindhudurg nature and literary heritage

सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्गातील निसर्गसंपदा आणि साहित्यिक वारसा आनंददायी आणि प्रेरणादायी असुन त्यामुळे आपण भारावून गेल्याची भावना…

2 hours ago

‘वर्दीतली वैखरी’ – खाकीतील संवेदनशील माणूसपण

खाकी वर्दी दिसली की डोळ्यांसमोर उभा राहतो तो कर्तव्यकठोर पोलीस; पण त्या वर्दीच्या आत धडधडणारे…

3 hours ago

अन्न वाचवायचे की प्लास्टिक? दोन्ही समस्यांवर बायो-फिल्म्स देणार का उत्तर? Biofilms For Plastic Free Packaging

अन्न उद्योगातील हरित क्रांती: प्लास्टिकमुक्त पॅकेजिंगसाठी 'बायो-फिल्म्स' आणि 'स्मार्ट इंडिकेटर्स'चा वापर अन्न ताजे आहे की…

12 hours ago

कवितेचे उदंड पीक आले, पण काळाच्या चाळणीत काय टिकणार?

दुसरे राज्यस्तरीय कवी संमेलन व ‘प्रबोधिनी कविरत्न पुरस्कार–२०२६’ सोहळा रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी…

13 hours ago

‘माझी ईडी चौकशी’ : विनोदातून जीवनाकडे पाहण्याची प्रसन्न दृष्टी

गंभीर विषयांकडेही खेळकरपणे पाहत वाचकांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारे लेखक सुनील पांडे यांच्या ‘माझी ईडी चौकशी’…

1 day ago

दरवाढीमागे इथेनॉल नव्हे धोरणातील विसंगती कारणीभूत ! sugar Price Rise Issue

विशेष आर्थिक लेख... सणासुदीच्या तोंडावर साखरेने ग्राहकांना अक्षरशः ‘कडू’ धक्का दिला आहे. देशातील अनेक बाजारांत…

1 day ago