काय चाललयं अवतीभवती

शनिवार पासून पावसाचा जोर काहीसा कमी होणार!

‘घाटमाथ्यावरील सक्रियेनंतर शेवटी मान्सून घाट उतरला !’
शनिवार पासून पावसाचा जोर काहीसा कमी होणार!’

१-गेल्या आठवड्यात(१७ ते २४जुलै) दरम्यान घाटमाथ्यावर हजेरी लावून मान्सून घाट उतरत, मराठवाड्यासहित खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अश्या (८+१०)१८ जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.

२-मराठवाडा वगळता महाराष्ट्रात आजपासुन शनिवार दि. ३ ऑगस्ट पर्यंतच्या १० दिवसात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

३-मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात  मात्र अतिजोरदार पावसाचीही शक्यता अजुनही कायम टिकूनच आहे.

४-परवा शनिवार दि.२७ जुलै पासून मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यात पुढील ६ दिवस म्हणजे १ ऑगस्ट पर्यन्त पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता जाणवते.

५-घाटमाथ्यावरील दमदार पावसाने सह्याद्रीच्या कुशीतील तसेच विदर्भातील धरणात जलसंवर्धन होत असुन, जलसाठा वाढीचे सातत्य टिकून आहे. जुलै अखेर ही धरणे १०० टक्क्याच्या आसपास भरण्याची शक्यता जाणवते.  मराठवाड्यातील जायकवाडी व इतर लघु-प्रकल्पातील धरणांसाठी मात्र अजुन काही काळ चांगलीच प्रतिक्षा करावी लागेल, असेच वाटते.

माणिकराव खुळे

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

शिक्षणमंत्री कोण, हा प्रश्न महत्त्वाचा की शिक्षणाची दृष्टी कोणाची, हा?

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने राजकीय वादाला तात्पुरता विराम मिळाला असेल;…

1 day ago

भगवंताच्या अंतःकरणातील अत्यंत गुप्त असे प्रेमरहस्य Bhagavant’s Secret of Divine Love

ही ओवी भक्ती आणि अद्वैत यांचा सुंदर संगम घडवते. काही जण म्हणतात भक्तीमध्ये द्वैत आहे…

2 days ago

जमिनीची खरी किंमत नेमकी कशी ठरते ? Key Factors That Determine Property Value

घर, प्लॉट किंवा शेतीची जमीन खरेदी-विक्री करताना बहुतांश लोक केवळ बाजारभाव किंवा सरकारी रेडी रेकनरवर…

2 days ago

विद्यार्थी, मध्यमवर्ग व शिक्षण व्यवस्थेची विश्वास परीक्षा ! विशेष लेख

नीट प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणानंतर देशभर उभे राहिलेले आंदोलन अखेर सरकारने प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर संपले.…

3 days ago

विषमुक्त शेती संशोधनासाठी श्रुतिका बागुल यांना ‘ऑरेंज सिटी आयकॉन अवॉर्ड २०२६’ Orange City Icon Award 2026 To Shrutika Bagul

नागपूर : विषमुक्त आणि रसायनमुक्त शेतीसाठी संशोधन,देशी गायींचे संवर्धन तसेच सेंद्रिय शेतीसाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित…

3 days ago

विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा वाद : जबाबदारी नेमकी कुणाची ?

स्टेटलाइन दिल्ली आणि बिहारमधील विद्यार्थी आंदोलनांदरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईवरून देशाचे राजकारण तापले आहे. संसदेच्या…

4 days ago