The intensity of the rain will decrease somewhat from Saturday
‘घाटमाथ्यावरील सक्रियेनंतर शेवटी मान्सून घाट उतरला !’
शनिवार पासून पावसाचा जोर काहीसा कमी होणार!’
१-गेल्या आठवड्यात(१७ ते २४जुलै) दरम्यान घाटमाथ्यावर हजेरी लावून मान्सून घाट उतरत, मराठवाड्यासहित खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अश्या (८+१०)१८ जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.
२-मराठवाडा वगळता महाराष्ट्रात आजपासुन शनिवार दि. ३ ऑगस्ट पर्यंतच्या १० दिवसात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
३-मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात मात्र अतिजोरदार पावसाचीही शक्यता अजुनही कायम टिकूनच आहे.
४-परवा शनिवार दि.२७ जुलै पासून मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यात पुढील ६ दिवस म्हणजे १ ऑगस्ट पर्यन्त पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता जाणवते.
५-घाटमाथ्यावरील दमदार पावसाने सह्याद्रीच्या कुशीतील तसेच विदर्भातील धरणात जलसंवर्धन होत असुन, जलसाठा वाढीचे सातत्य टिकून आहे. जुलै अखेर ही धरणे १०० टक्क्याच्या आसपास भरण्याची शक्यता जाणवते. मराठवाड्यातील जायकवाडी व इतर लघु-प्रकल्पातील धरणांसाठी मात्र अजुन काही काळ चांगलीच प्रतिक्षा करावी लागेल, असेच वाटते.
माणिकराव खुळे
कर्करोगावरील उपचार अधिक परिणामकारक आणि लक्ष्यित करण्यासाठी जगभरात नवनव्या वैज्ञानिक पद्धतींचा शोध घेतला जात आहे.…
गणेशाला प्रिय करवीर : धार्मिक श्रद्धेसोबत आयुर्वेदातील महत्त्व गणरायाला प्रिय असलेल्या फुलांमध्ये कण्हेर अर्थात करवीराचे…
साखरेचा घाऊक साठा करणाऱ्या ग्राहकांसाठी, साठा करण्याची मर्यादा, 15 दिवसांवरुन 30 दिवसांपर्यंत शिथिल करण्याचा सरकारचा…
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातील रशियन भाषेचे विद्यार्थी वैभव कदम आणि प्राजक्ता डवरी…
संपत्तीची शाश्वत वाढ आपल्यापैकी प्रत्येकालाच हवी असते. आजच्या टोकाच्या अनिश्चिततेच्या जगात तर ती जास्तच तीव्रतेनं…
गणेश पूजेदरम्यान आघाड्याची पाने वाहताना "ॐ गुहाग्रजाय नमः अपामार्गपत्रं समर्पयामि" हा मंत्र म्हटला जातो. अपामार्ग'…