काय चाललयं अवतीभवती

तिळगंगा अक्षरमैत्र पुरस्कार बालसाहित्यिका वर्षा चौगुले यांना जाहीर

तिळगंगा अक्षरमैत्र पुरस्कार बालसाहित्यिका वर्षा चौगुले यांना जाहीर

सांगली – पेठ येथील तिळगंगा साहित्यरंग परिवार यांच्याकडून या वर्षीपासून बालसाहित्यासाठी ‘तिळगंगा अक्षरमैत्र पुरस्कार’ देण्यात येणार असून रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सत्कार आणि ग्रंथभेट असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. तिळगंगा अक्षरमैत्र पुरस्कार कोणत्याही विशिष्ट साहित्यकृतीला देण्यात येणार नसून बालसाहित्यिकांची एकूण साहित्यिक कारकीर्द विचारात घेऊन पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे.

तिळगंगा अक्षरमैत्र पुरस्कार २०२४ हा पहिला पुरस्कार ज्येष्ठ बालसहित्यिका वर्षा चौगुले ( सांगली ) यांना जाहीर करण्यात आला आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित साहित्यिका वर्षा चौगुले यांची ‘मैत्री’, ‘बार्बी डॉल’, ‘कुछ समझें बच्चमजी ?’ , ‘अशी फुलते कविता’, ‘सहल’, ‘रंगात रंगू या रे’, ‘चिव चिव चिमणी’ आणि ‘गंमत शब्दांची’ ही बालसाहित्याची पुस्तके प्रकाशित झाली असून ‘भरलेले आभाळ’, ‘पेलवेना भार हा’, ‘धुरकटलेल्या वाटा’, ‘चाफ्याची ओंजळ’, ‘स्मार्ट बॉक्स’ ही पुस्तकेही प्रसिद्ध झालेली आहेत.

तिळगंगा अक्षरमैत्र पुरस्कार १ डिसेंम्बर २०२४ रोजी नायकलवाडी, पेठ जि. सांगली येथे होणाऱ्या एकदिवसीय सातव्या तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. असे तिळगंगा साहित्यरंग परिवाराचे संस्थापक आनंदहरी, पंडित लोहार, संस्थापक अध्यक्ष मेहबूब जमादार आणि कार्यवाह महादेव हवालदार यांनी सांगितले.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

३६ हजार बंद उद्योगांचे वास्तव!

विशेष आर्थिक लेख. महाराष्ट्रातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या गेल्या पाच वर्षांत बंद झाल्याची माहिती संसदेत…

13 hours ago

‘आभाळाच्या गावी’- बालसुलभ मनाचा काव्यात्म आविष्कार करणारी कविता

बालमन म्हणजे निरागस प्रश्नांचे,अनोख्या कल्पनांचे आणि छोट्या-छोट्या गोष्टींत आनंद शोधणाऱ्या कुतूहलाचे सुंदर विश्व. या विश्वाचा…

14 hours ago

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कारांची घोषणा

वैशाली पाटील, सीमा क्षीरसागर यांना शेती-पाणी पुरस्कार; चार मान्यवरांना साहित्य पुरस्कार मुंबई : यशवंतराव चव्हाण…

1 day ago

यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराची नामांकन प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता आणि अंतिम मुदत

राष्ट्रीय एकात्मता, संवैधानिक मूल्ये आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्थांना संधी मुंबई :…

1 day ago

सहाय्यक प्राध्यापक भरती पारदर्शक की पुन्हा ‘व्यक्तीनिष्ठ’? ५,००० हून अधिक पदांच्या प्रक्रियेवर संभ्रम का?

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रातील हजारो इच्छुक उमेदवारांसाठी सहाय्यक प्राध्यापक भरतीची प्रक्रिया ही आशेचा किरण ठरली…

2 days ago