काय चाललयं अवतीभवती

यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराची नामांकन प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता आणि अंतिम मुदत

राष्ट्रीय एकात्मता, संवैधानिक मूल्ये आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्थांना संधी

मुंबई : संयुक्त आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी पात्र व्यक्ती आणि संस्थांकडून नामांकन मागविण्यात आले असून, ३० सप्टेंबर २०२६ ही नामांकनाची अंतिम तारीख आहे.

राष्ट्रीय एकात्मता,संवैधानिक मूल्यांचे जतन तसेच भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी भरीव,उल्लेखनीय आणि अग्रेसर कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे.

यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक,राजकीय आणि आर्थिक जडणघडणीत तसेच देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या व्यापक राष्ट्रवादी दृष्टिकोनाला आणि लोकशाही मूल्यांना अधोरेखित करणाऱ्या कार्याचा गौरव व्हावा,या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो.

या पुरस्काराने यापूर्वी डॉ.जयंत नारळीकर,आर.के.लक्ष्मण, महाश्वेता देवी, भारतीय वायुसेनेचे मार्शल अर्जन सिंग, रतन टाटा, अझीम प्रेमजी, सौम्या स्वामीनाथन आणि प्रा.अनिल कुमार गुप्ता यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे.

हा पुरस्कार भारतीय नागरिकत्व असलेल्या व्यक्तींना किंवा भारतात नोंदणीकृत संस्थांना प्रदान केला जाणार आहे.पुरस्कारासाठी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेने स्वतःहून नामांकन करण्याऐवजी इतर व्यक्ती किंवा संस्थांकडून शिफारस करण्यात येणे अपेक्षित आहे.नामनिर्देशन ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत यशवंतराव चव्हाण सेंटरकडे पोहोचणे आवश्यक आहे.

पुरस्कारासंदर्भातील सविस्तर माहिती यशवंतराव चव्हाण सेंटरच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
यशवंतराव चव्हाण सेंटर,
जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉइंट,
मुंबई – ४०० ०२१.
दूरध्वनी : ०२२-२२०२८५९८
ई-मेल : info@chavancentre.org

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

सहाय्यक प्राध्यापक भरती पारदर्शक की पुन्हा ‘व्यक्तीनिष्ठ’? ५,००० हून अधिक पदांच्या प्रक्रियेवर संभ्रम का?

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रातील हजारो इच्छुक उमेदवारांसाठी सहाय्यक प्राध्यापक भरतीची प्रक्रिया ही आशेचा किरण ठरली…

10 hours ago

स्वतःच्या डोळ्यांनी ‘अजत्व’ कसे पाहता येते? ज्ञानेश्वरीतील गूढ संदेश काय?

ज्ञानेश्वरीतील ही ओवी साधकाला बाह्य जगाच्या धावपळीपासून अंतर्मुख शांततेकडे घेऊन जाते. ‘तैसे राहोनि ठायठिके’ म्हणताना…

12 hours ago

पुण्याच्या भूमीतून डिजिटल विश्वाला नवी दिशा ! BRICS ICT Track 2026 In Pune

पुण्याचे डिजिटल शिखर १७ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पुण्यात पार पडलेली 'ब्रिक्स आयसीटी…

21 hours ago

विचारांची मशाल घेऊन अंधाराशी लढलेला लोकशिक्षक : डॉ. नरेंद्र दाभोळकर

चमत्कारांच्या नावाखाली होणारी फसवणूक, अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला समाज, जात-धर्माच्या भिंती आणि प्रश्न विचारण्यालाच लागलेली भीती—या…

1 day ago

श्रीगुरूंचा महिमा जाणण्याचे साधन कोणते ? Guru Mahima: The Power of Surrender in Dnyaneshwari

गुरूंचा महिमा शब्दांत कितीही सांगितला, तरी तो पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही. कारण गुरू हे…

2 days ago