📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 22, 2026
काय चाललयं अवतीभवती

तिळगंगा अक्षरमैत्र पुरस्कार बालसाहित्यिका वर्षा चौगुले यांना जाहीर

Tilganga Aksharmaitra Award announced to childrens writer Varsha Chaugule

तिळगंगा अक्षरमैत्र पुरस्कार बालसाहित्यिका वर्षा चौगुले यांना जाहीर

सांगली – पेठ येथील तिळगंगा साहित्यरंग परिवार यांच्याकडून या वर्षीपासून बालसाहित्यासाठी ‘तिळगंगा अक्षरमैत्र पुरस्कार’ देण्यात येणार असून रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सत्कार आणि ग्रंथभेट असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. तिळगंगा अक्षरमैत्र पुरस्कार कोणत्याही विशिष्ट साहित्यकृतीला देण्यात येणार नसून बालसाहित्यिकांची एकूण साहित्यिक कारकीर्द विचारात घेऊन पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे.

तिळगंगा अक्षरमैत्र पुरस्कार २०२४ हा पहिला पुरस्कार ज्येष्ठ बालसहित्यिका वर्षा चौगुले ( सांगली ) यांना जाहीर करण्यात आला आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित साहित्यिका वर्षा चौगुले यांची ‘मैत्री’, ‘बार्बी डॉल’, ‘कुछ समझें बच्चमजी ?’ , ‘अशी फुलते कविता’, ‘सहल’, ‘रंगात रंगू या रे’, ‘चिव चिव चिमणी’ आणि ‘गंमत शब्दांची’ ही बालसाहित्याची पुस्तके प्रकाशित झाली असून ‘भरलेले आभाळ’, ‘पेलवेना भार हा’, ‘धुरकटलेल्या वाटा’, ‘चाफ्याची ओंजळ’, ‘स्मार्ट बॉक्स’ ही पुस्तकेही प्रसिद्ध झालेली आहेत.

तिळगंगा अक्षरमैत्र पुरस्कार १ डिसेंम्बर २०२४ रोजी नायकलवाडी, पेठ जि. सांगली येथे होणाऱ्या एकदिवसीय सातव्या तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. असे तिळगंगा साहित्यरंग परिवाराचे संस्थापक आनंदहरी, पंडित लोहार, संस्थापक अध्यक्ष मेहबूब जमादार आणि कार्यवाह महादेव हवालदार यांनी सांगितले.

Related posts

खाद्यपदार्थातील साखर, सोडियम, मेद बाबतची माहिती ठळक अक्षरात देण्याची सुचना

गदिमा साहित्य पुरस्कार जाहीर

असो चैतको मयना’ हा कलाली बोलीतील हृदयस्पर्शी कविता संग्रह – कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406