क्राईम

मुंबई विमानतळावर 2.67 कोटी रुपयांचे सोने जप्त, दोघांना अटक

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या  मुंबई विभागाने 2.67 कोटी रुपयांचे सोने केले जप्त, मुंबई विमानतळावर तस्करी प्रकरणात दोघांना अटक

मुंबई – येथील महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3,350 ग्रॅम सोने जप्त केले. या सोन्याची किंमत तब्बल 2.67 कोटी रुपये इतकी आहे. या तस्करी प्रकरणात दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

सेलेबी एनएएस एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा एक कनिष्ठ कर्मचारी आणि ग्राहक सेवेत कार्यरत असणाऱ्या एका महिलेचा अटक केलेल्यात समावेश आहे.

विशिष्ट गोपनीय  माहितीच्या आधारे, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या बाहेर पडण्याच्या प्रवेशद्वारावर ग्राहक सेवेत कार्यरत असणाऱ्या एका महिलेला थांबवले असता त्यावेळी तिच्याकडे द्रव्य स्वरूपात लपवून ठेवलेले सोने आढळले.

तपासात  समोर आले की, विमानतळावरील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याने ‘इवाय 200’ या विमानाच्या वेस्ट कार्टमधून सोने बाहेर काढून ते एका महिला कर्मचाऱ्याकडे दिले. जेणेकरून ती महिला तिचा विमानतळ प्रवेश परवाना (एइपी) वापरून ते सोने बाहेर नेऊ शकेल. या दोन्ही व्यक्तींना सीमाशुल्क कायदा , 1962 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

हळदीचे कंद सडतायत, पीक मरतंय? कारणे ओळखा, वेळीच करा प्रभावी व्यवस्थापन ! Turmeric Rhizome Rot and Wilt

हळद पिकातील कंद सड व मर : कारणे, लक्षणे आणि प्रभावी व्यवस्थापन हळद आणि अद्रक…

1 day ago

सृष्टी निर्माण झाली कशी? श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले गूढ काय?

सृष्टीकडे पाहिले की असंख्य रूपे, जीव, शक्ती आणि घडामोडी आपल्याला दिसतात. या विराट पसाऱ्यामागे नेमकी…

3 days ago

सर्व महामानवांच्या सामर्थ्याची बेरीज म्हणजे भारत: डॉ. श्रीपाल सबनीस

कोल्हापूर : भारत हा कोणत्याही एका महामानवाचा,एका धर्माचा किंवा एका विचारपरंपरेचा नाही. बुद्ध, महावीर, संत…

3 days ago

अंदाजाची शेती संपणार? ड्रोन, सेन्सर अन् एआय ठरवणार पिकांचे भवितव्य ! Smart Farming with Drone and AI Techique

डिजिटल क्रांती: समृद्ध शेतीचा पाया/ 'स्मार्ट शेती, भरघोस प्रगती' ड्रोनची फवारणी, मोबाईलवर मातीचे रिपोर्ट आणि…

3 days ago

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे (नाशिक)यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार,संहिता राजन (पुणे)…

3 days ago

२२ परीक्षा रद्द, दोन हजार नोकऱ्या मात्र धोक्यात!

स्टेटलाइन - झारखंडच्या राजकारणात सध्या सत्तेच्या खुर्चीपेक्षा विद्यार्थ्यांच्या संतापाची ताकद मोठी ठरताना दिसत आहे. रांचीच्या…

3 days ago