काय चाललयं अवतीभवती

खांडेकर, जनाबाई पुरस्कारासाठी ग्रंथ पाठवण्याचे आवाहन

कोल्हापूर – दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय वि. स. खांडेकर आणि जनाबाई पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन लेखक, प्रकाशकांना करण्यात आले आहे. २०२५ या वर्षात प्रकाशित झालेली पुस्तके ०५ एप्रिल २०२६ पूर्वी पाठवावीत. जनाबाई पुरस्कार फक्त कवयित्रींसाठी आहे. ज्या कवयित्रींनी रत्नाकर काव्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवली आहेत त्यांनी जनाबाई पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती सभेच्यावतीने देण्यात आली आहे.

सातारा येथील कवयित्री प्रा. डॉ. रामकली पावसकर यांच्यामार्फत त्यांचे वडील प्रा. मनोहर कोपर्डे यांच्या स्मरणार्थ वि. स. खांडेकर पुरस्कार आणि आई श्रीमती कमल मनोहर कोपर्ड यांच्या स्मरणार्थ जनाबाई पुरस्कार देण्यात येणार आहे. वि. स. खांडेकर पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून पहिला पुरस्कार संग्राम गायकवाड यांना ‘मनसमझावन’ या कादंबरीसाठी तर दुसरा पुरस्कार अमोल पालेकर यांच्या ‘ऐवज एक स्मृतिबंध ‘ साठी देण्यात आला होता. खांडेकर पुरस्कारासाठी कथा, कादंबरी, ललित आणि आत्मकथन या वाड्.मय प्रकारातील पुस्तके पाठवता येतील. जनाबाई पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून पहिला पुरस्कार प्रज्ञा दया पवार यांना ‘ हिल्लोळ हरवून आतबाहेरचा’ या संग्रहासाठी देण्यात आला होता.

दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप प्रत्येकी २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे आहे. ०१ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या दोन प्रती ०५ एप्रिल, २०२६ पर्यंत दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, ६, स्मृती अपार्टमेंट, ए वॉर्ड, बाबूजमाल रोड, कोल्हापूरः ४१६००२ या पत्त्यावर पाठवाव्यात.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: Iye Marathichiye Nagariआत्मकथन पुस्तकेइये मराठीचिये नगरीकोल्हापूर सांस्कृतिक वार्ताकोल्हापूर साहित्य कार्यक्रमकोल्हापूर साहित्य सभाखांडेकर साहित्य पुरस्कारजनाबाई काव्य पुरस्कारजनाबाई पुरस्कारदक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा पुरस्कारपुस्तक पाठवण्याचे आवाहनमराठी कथा संग्रहमराठी कविता संग्रहमराठी कवीमराठी कवी संमेलनमराठी कादंबरीमराठी कादंबरी स्पर्धामराठी काव्यलेखनमराठी काव्यसंग्रहमराठी पुस्तक प्रकाशनमराठी पुस्तक लेखकमराठी पुस्तक स्पर्धामराठी पुस्तक स्पर्धा २०२५मराठी पुस्तके २०२५मराठी प्रकाशकमराठी ललित लेखनमराठी लेखकमराठी लेखक संघमराठी लेखक समुदायमराठी लेखकांना आवाहनमराठी लेखन स्पर्धामराठी वाङ्मयमराठी सर्जनशील लेखनमराठी साहित्य घडामोडीमराठी साहित्य चळवळमराठी साहित्य परंपरामराठी साहित्य परिषदमराठी साहित्य पुरस्कारमराठी साहित्य बातमीमराठी साहित्य मंचमराठी साहित्यिक वार्तामहाराष्ट्र सांस्कृतिक बातम्यामहाराष्ट्र साहित्य पुरस्कारराज्यस्तरीय साहित्य पुरस्कारवि स खांडेकर पुरस्कारसाहित्य क्षेत्रातील गौरवसाहित्य पुरस्कार २०२६साहित्य सभेचे पुरस्कारसाहित्य स्पर्धा महाराष्ट्रसाहित्यिक कार्यक्रमसाहित्यिक गौरवसाहित्यिक पुरस्कार महाराष्ट्र

Recent Posts

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

9 hours ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

10 hours ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

19 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

1 day ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

2 days ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

2 days ago