fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 21, 2026
Home » खांडेकर, जनाबाई पुरस्कारासाठी ग्रंथ पाठवण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

खांडेकर, जनाबाई पुरस्कारासाठी ग्रंथ पाठवण्याचे आवाहन

Book submission call announced for V S Khandekar and Janabai literary awards by Dakshin Maharashtra Sahitya Sabha Kolhapur

कोल्हापूर – दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय वि. स. खांडेकर आणि जनाबाई पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन लेखक, प्रकाशकांना करण्यात आले आहे. २०२५ या वर्षात प्रकाशित झालेली पुस्तके ०५ एप्रिल २०२६ पूर्वी पाठवावीत. जनाबाई पुरस्कार फक्त कवयित्रींसाठी आहे. ज्या कवयित्रींनी रत्नाकर काव्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवली आहेत त्यांनी जनाबाई पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती सभेच्यावतीने देण्यात आली आहे.

सातारा येथील कवयित्री प्रा. डॉ. रामकली पावसकर यांच्यामार्फत त्यांचे वडील प्रा. मनोहर कोपर्डे यांच्या स्मरणार्थ वि. स. खांडेकर पुरस्कार आणि आई श्रीमती कमल मनोहर कोपर्ड यांच्या स्मरणार्थ जनाबाई पुरस्कार देण्यात येणार आहे. वि. स. खांडेकर पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून पहिला पुरस्कार संग्राम गायकवाड यांना ‘मनसमझावन’ या कादंबरीसाठी तर दुसरा पुरस्कार अमोल पालेकर यांच्या ‘ऐवज एक स्मृतिबंध ‘ साठी देण्यात आला होता. खांडेकर पुरस्कारासाठी कथा, कादंबरी, ललित आणि आत्मकथन या वाड्.मय प्रकारातील पुस्तके पाठवता येतील. जनाबाई पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून पहिला पुरस्कार प्रज्ञा दया पवार यांना ‘ हिल्लोळ हरवून आतबाहेरचा’ या संग्रहासाठी देण्यात आला होता.

दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप प्रत्येकी २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे आहे. ०१ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या दोन प्रती ०५ एप्रिल, २०२६ पर्यंत दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, ६, स्मृती अपार्टमेंट, ए वॉर्ड, बाबूजमाल रोड, कोल्हापूरः ४१६००२ या पत्त्यावर पाठवाव्यात.

Related posts

लालपरीचा लाल डबा कोणी केला ?

वसंत पाटणकर यांना समीक्षा पुरस्कार

कवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त दीर्घ काव्य लेखन स्पर्धा

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!