Retired IAS officer Leena Mehendale selected as president of the first All India Marathi Literary Conference of Women Government Officers to be held in Delhi on April 11–12, 2026.
दिल्ली येथे होणाऱ्या पहिल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी (निवृत्त) लीना मेहेंदळे यांची निवड
नवी दिल्ली: येथे 11 व 12 एप्रिल 2026 या दिवशी महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन सरहद संस्था, पुणे, नवीन महाराष्ट्र सदन यांच्या वतीने आणि मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने करण्यात आले आहे. हे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या 351 व्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले आहे. या पहिल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या संमेलनाच्या अध्यक्षपदी वरिष्ठ प्रशासकीय (निवृत्त) अधिकारी 1974 बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील सदस्या लीना मेहेंदळे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा संमेलनाच्या निमंत्रक आर. विमला तसेच स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी यांनी केली आहे.
लीना मेहेंदळे यांचा जन्म जळगांव जिल्ह्यातील धरणगांव येथे झाला. त्या महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन या पदावरून त्या निवृत्त झाल्या. त्यांनी गोवा राज्याच्या मुख्य माहिती अधिकारी पदाची जबाबदारीही सांभाळली आहे. महसूल, प्रशासन, प्रशासकीय कायद्याची अंमलबजावणी, विकास प्रशासन, कार्यालयीन कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असे सर्वच महत्वाचे विषय त्यांनी हाताळले आहेत. त्यांनी राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
लीना मेहेंदळे यांचे विविध विषयांवर 500 पेक्षा अधिक लेख आणि 24 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचा हिंदी भाषेत अनुवाद केला आहे. त्यांची 19 पुस्तके अनुवादाचीच आहेत. एका मराठी नाटकाचा व एका कादंबरीचाही त्यांनी अनुवाद केला आहे. द लास्ट पास ही इंग्रजी भाषेतील कादंबरी त्यांनी मराठीत अनुवादित केली. लहान मुलांसाठी देखील त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. पक्षीनिरीक्षण, निसर्गाोपचार, प्रशासकीय सुधारणा हे त्यांचे आवडते विषय आहेत. संगीचाचीही त्यांना आवड आहे.
संयोजन समितीतील सदस्यांनी विविध नावांची चर्चा करून पैकी ज्येष्ठता आणि साहित्यिक क्षेत्रातील योगदानाचा विचार करून लीना मेहेंदळे यांची निवड एकमताने केली आहे.
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…