मुक्त संवाद

विठ्ठलाच्या मागे लोड का लावतात ?

श्रमाने थकलेल्या देवाला निदान थोडी तरी विश्रांती मिळावी, अवघडलेपणा कमी व्हावा म्हणून पाठ टेकण्यासाठी पाठीला लोड दिला जातो. अगदी पुरातन काळापासून ही परंपरा आहे. तो लोड आषाढ शुद्ध द्वितीये पासून प्रक्षाळपुजा होईपर्यंत असतो.

मीरा उत्पात-ताशी.

तुम्ही विठ्ठलरूक्मिणीचे सध्या काढलेले फोटो पाहात असाल तर तुम्हाला विठ्ठलाच्या मागे लोड लावलेला दिसेल. आणि रूक्मिणी मातेच्या मागे तक्क्या लावलेला. दिसेल. याच्या मागे काय कारण आहे? ही काय परंपरा आहे? असा प्रश्न पडला असेल ना? तर त्याचं उत्तर असं आहे की आषाढी वारीची देव सुद्धा वाट पहात असतो. या विठ्ठलाचं सगळं उलटं आहे. इतर ठिकाणी भक्त देवाच्या भेटीसाठी आतुर असतात. पण इथे देव सुद्धा भेटीसाठी भक्तांइतकाच आतुर असतो.

आषाढी कार्तिकी विसरू नका मज।
सांगतसे गूज पांडुरंग।
असं प्रत्यक्ष विठ्ठल सांगतो आहे. कारण त्याला भक्तांचा नित्य सहवास आवडतो. त्यामुळे जसे भक्त त्याच्या भेटीसाठी आसुसलेले असतात. तसा तोही त्यांच्या भेटी साठी आसुसलेला असतो. त्यामुळेच तो केवळ आणि केवळ त्यांच्या मनमुक्त भेटीसाठी आपले राजोपचार त्यागतो. अन् विटेवर तासन् तास तिष्ठत उभा राहतो. काकडा, अपरान्ह पूजा, धुपारती, शेजारती सगळं सगळं त्यागतो. केवळ नित्य स्नान आणि भोजन इतकेच उपचार करवून घेतो.. ज्यामुळे भक्तमांदियाळींना अविरत भेटता येईल. आणि त्यांचं सुखदुःख जाणता येईल. देवाणघेवाण होईल. कारण देवालाही आपली सुखदुःखं सांगायची आहेत. त्याला हे सांगायला भक्तांशिवाय कोण आहे? तिन्ही त्रिभुवनी नाही मज कोणी। म्हणे चक्रपाणी नामयासी।

इतर उपचारांमध्ये, निद्रेमध्ये कालापव्यय होईल. पर्यायाने भक्तांच्या भैटीचा कालावधी कमी होईल म्हणून देव या साऱ्या गोष्टी त्यागतात. अन् केवळ भक्त भेटीसाठी विटेवर उभे राहतात.
ते अगदी यात्रा संपेपर्यंत. मग रात्रंदिवस उभं राहून देवाला किती शीण होतो. श्रमाने थकलेल्या देवाला निदान थोडी तरी विश्रांती मिळावी, अवघडलेपणा कमी व्हावा म्हणून पाठ टेकण्यासाठी पाठीला लोड दिला जातो. अगदी पुरातन काळापासून ही परंपरा आहे. तो लोड आषाढ शुद्ध द्वितीये पासून प्रक्षाळपुजा होईपर्यंत असतो. आणि देवही प्रक्षाळपूजेपर्यत भक्तभेटीसाठी तिष्ठत उभा असतो.. रूक्मिणीमातेसह…

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

13 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

1 day ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

1 day ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

2 days ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago

स्त्रीवादी साहित्याची नवी दिशा : डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांचे अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषण New direction of feminist literature

स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…

2 days ago