काय चाललयं अवतीभवती

योग्य नियोजनातून वनरक्षकांनी गव्याला कालव्यातून काढले बाहेर…

गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू या घटना वाढत आहेत. या घटना रोखण्यासाठी वनविभाग सतर्क आहे. योग्य नियोजनातून गव्याला नागरीवस्तीतून जंगलात सोडण्यासाठी सतत प्रयत्नात असते. रिळे येथे कालव्यात अडकलेल्या गव्याला सुखरुप बाहेर काढून आदिवासात सोडले.

अजितकुमार पाटील

रिळे (ता. शिराळा) येथील ग्रामस्थांना सकाळी आठच्या दरम्यान खंडोबा मंदिराच्या परिसरात गव्याचे दर्शन झाले. या गव्याला माणसांची चाहूल लागताच त्याने फुफेरे फाटा नजीक असणाऱ्या शेत शिवाराकडील कालव्याकडे धाव घेतली. रिळे येथील वारणा डावा कालव्यात हा गवा खाली उतरला. हा मुख्य कालवा असल्याने, त्यातून गवा बाहेर पडू शकतं न्हवता. गवा आल्याची बातमी परिसरात पसरल्याने रिळेसह परिसरातील अनेक नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी व कालव्यातून बाहेर काढण्यासाठी गर्दी केली.

लोकांच्या गर्दीला व आवाजाला घाबरून हा गवा कालव्यामधून पुढे सरकत रिळे गावा नजिक असलेल्या डाव्या कालव्याच्या जलसेतू (aqueduct)मधून पुढे शिराळे खुर्द-फुपरे गावच्या हद्दीवरील पावले वस्तीनजीक पोहोचला होता. या बाबतची माहिती नागरिकांनी वन विभागाला कळवली होती त्यामुळे वन रक्षक हणमंत पाटील व प्रकाश पाटील हे वन मजुरा सोबत घटनास्थळी पोचले व गव्या पासून लोकांना दूर ठेवले. कालव्यातून बाहेर पडण्यासाठी गवा प्रयत्न करत होता.

वन कर्मचाऱ्यांनी लाईव्ह लोकेशन घेतले व जागेचा आढावा घेतला. मधेच असलेला छोटा बोगद्या पार करून गवा पुढे सरकला होता. गुगल मॅपवर पाहिले असता पुढे एक मातीचा बांध होता तिथपर्यंत गवा जाईल व त्यातून तो सुखरूप बाहेर येईल असं नियोजन फोनवरून करण्यात आले. कालव्यात झाडी नसल्याने सावली अजिबात नव्हती. उन्हाचा ताव त्यामुळे गवा पूर्ण दमला होता. मातीचा बांध पार करून बाहेर जात असताना लोकांना पाहून तो परत कालव्यात उतरला. लोकांना दूर करत गावाच्या विरूद्ध बाजूला असलेल्या काठाने गवा वर चडून येईल असे नियोजन केले व जागा निर्मनुष्य केली गेली. गवा काही वेळातच कालव्यातून बाहेर आला व जंगलाचे निरिक्षण करत सुखरूप निघून गेला.

काही दिवसापूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यात घडलेल्या दोन घटनात , गव्याला हुसकत असताना हल्ले झाल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. अशा घटनेची पुनरावृत्ती सांगली जिल्ह्यात होवू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेत या गव्याला न दमवता किंवा न भीती दाखवता त्याच्या मर्जीने कालव्यातून सुखरूप बाहेर काढण्यात, वन विभाातर्फे बिळाशीचे वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक पी. एन .पाटील, हनुमंत पाटील आदींसह अमर पाटील, तानाजी यांनी जागेवर नियोजनपूर्वक काम केलं.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

5 hours ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

1 day ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

2 days ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

2 days ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

2 days ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

3 days ago