📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 14, 2026
काय चाललयं अवतीभवती

आळसंद ला सोमवारी पाचवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

Alsand Marathi Sahitya Samhelan

संमेलनाध्यक्षपदी : डॉ. रणधीर शिंदे ; स्वागताध्यक्ष: अपर्णा पाटील

आळसंद ( ता. खानापूर ) येथील स्व.‌ श्रीमंत खानाजीराव जाधव‌ दिशा, साहित्य, संस्कृती, कला प्रतिष्ठान यांच्यावतीने सोमवारी ( ता. २२ ) सकाळी पाचवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिध्द साहित्यिक, राज्य साहित्य, सांस्कृतिक मंडळाचे सदस्य डॉ. प्रा. रणधीर शिंदे ( कोल्हापूर ) यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होणार आहे, अशी माहिती संयोजक संग्राम जाधव यांनी दिली.

जाधव म्हणाले, आळसंद नगरीत सकाळी ९ वाजता सिध्दनाथ मंदिरापासून ग्रंथ दिंडी निघणार आहे. यामध्ये टाळ, मृदुंगांचा गजर, वारकरी वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार देवदत्त राजोपाध्ये यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. कवयित्री अपर्णा पाटील ( कोल्हापूर ) स्वागताध्यक्ष आहेत. सरपंच अभिनंदन जाधव , सुभाष पाटील , धर्मेंद्र पवार प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

ते म्हणाले, दुसऱ्या सत्रात गझलकार सुधीर इनामदार ( आटपाडी) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. यावेळी महेश कोष्टी , सुनिल दबडे, प्रा‌. विश्वनाथ गायकवाड, रघुराज मेटकरी , एकनाथ गायकवाड प्रमुख उपस्थित आहेत.

अशोकराव देशमुख, खंडेराव जाधव , प्रा. विश्वनाथ गायकवाड, रत्नकुमार नरुले , विनोद जाधव , दीपक पवार , गणेश शेटे , शरद माळी , रमेश कोष्टी , दीपक सावंत हे संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Related posts

ज्येष्ठ अमेरिकन इतिहासकार मांडणार महाराणी ताराबाई यांच्या कार्यावर मते

दरडी का कोसळतात?

काळ पिके परतणीचा, दुपारच्या कमाल तापमान वाढीचा

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!