Anathachi Mai Poem on Sindhutai Sapkal by Anagha Sawardekar Patil
वर्धा जिल्ह्यातील नवरगावी
सिंधूताईंचा जन्म झाला
गुरे वळण्याचा वडिलांचा
बालपणी व्यवसाय त्यांनी केला..१
मुलगा घराचा वारस
सर्वांना हवा असे
मुलींचा जन्म होणे
आईबापाला ताप भासे..२
मुलगी असे नकोशी
म्हणून चिंधी नाव ठेवले
गुरे वळायला जाताना सांगून
शाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेतले..३
वयाच्या नवव्या वर्षी
वयस्क पतीशी लग्न झाले
काबाडकष्ट मात्र तिच्या
नशिबास नाही चुकले..४
लहान वयातच तिच्यावर
मातृत्वाचे ओझे पडले
सगळ्यांनी निराधार केले
स्मशानभूमीत राहून पोट भरले..५
वनवासी झाली माय
नाही मानली हार
अनाथांची बनली आई
दिला निराधार मुलांना आधार..६
मिळाले अनेक उच्च पुरस्कार
पद्मश्रीने तिला गौरविले
प्रत्येक अनाथाची आई झाली
ह्रदयात सर्वांच्या अढळ स्थान राहिले..७
सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…
"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…