विश्वाचे आर्त

अवचितयावरी सर्वस्व सांडिजे । चोख तरी तोचि भांडारी कीजे । तैसा तूं आतां माझे । निजधाम कीं ।।

अध्यात्मात संतसुद्धा शिष्यामध्ये हाच भाव पाहतात. संतांकडे दररोज हजारो माणसे भेट देतात. हाताची पाचही बोटे सारखी नसतात. तशी सर्वच माणसे ही सारखी नसतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो.
– राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

अवचितयावरी सर्वस्व सांडिजे । चोख तरी तोचि भांडारी कीजे ।
तैसा तूं आतां माझे । निजधाम कीं ।। 52 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 10 वा

ओवीचा अर्थ – एखाद्या अकस्मात आलेल्या मनुष्यावर आपलें सर्वस्व सोंपवावें व तो प्रामाणिक आहे असें आढळून आलें, तर त्यालाच खजिनदार करावा, त्याप्रमाणें आम्ही तुला सांगितलेलें तूं लक्षपूर्वक ऐकतोस, अशी आमची खात्री झाल्यामुळें तूं आता आमचें राहण्याचे ठिकाण झाला आहेस.

जीवनात अनेक माणसे आपल्याला भेटत असतात. आपल्या आयुष्यात येत असतात. प्रत्येक माणूस हा विश्वासहार्य असेलच असे नाही. अचानक जीवनात आलेल्या माणसावर पटकण आपण विश्वास ठेवणे तितके शक्य नसते. आपण कोणावर विश्वास ठेवतो ? अनेकजण आपणास आमिषे दाखवतात व फसवतात. आपण त्यांच्या त्या दुष्टचक्रात सापडतो यात आपलेच नुकसान होते. पण अशी फसवणारी माणसे नेहमीच भेटतात असे नाही. मुळात अशी फसवणारी माणसे आपण आपल्या आयुष्यातून दूर ठेवायला हवीत. आपण फसलो म्हणजे आपण हरलो असे कधीच होत नाही किंवा तो जिंकला असेही होत नाही. फसवणूकीमध्ये हार-जीत नसतेचमुळी.

ठेच एकदा लागल्यानंतर माणूस शहाणा होतो. पण त्यातून शहाणपण येते. पुन्हा त्या मार्गावर तो सावधपणे चालतो. ज्या दगडामुळे ठेच लागला तो दिसताक्षणी योग्य ती खबरदारी घेतो. वाटेत येणारा तो अडथळा तो दूर करतो. जीवनात वागतानाही असेच करावे लागते. फसवणूक करणाऱ्या माणसांपासून दूर राहणेच कधीही उत्तम. एकदा फसल्यानंतर पुन्हा फसणार नाही याची काळजी घेणे हे उत्तम.

काही अनोखळी माणसे सुद्धा. किंवा कधी ज्यांचा आपल्याशी संपर्क आला नाही अशी माणसेही आपणास अनपेक्षीतपणे मदत करतात. निरपेक्ष भावनेने मदत करतात. त्यातून त्यांना काही मिळो न मिळो फक्त समाधानासाठी ते मदत करत असतात. अशी प्रेमळ माणसे जीवनात आली तर आपण त्यांच्यावर निश्चितच विश्वास टाकतो. आपले सर्वस्व आपण त्यांना सोपवतो. अशा व्यक्तीला आपण खजिनदार जरूर करावे कारण तो तुमची योग्यप्रकारे काळजी घेऊ शकतो. त्या पदासाठी तो योग्य असतो.

अध्यात्मात संतसुद्धा शिष्यामध्ये हाच भाव पाहतात. संतांकडे दररोज हजारो माणसे भेट देतात. हाताची पाचही बोटे सारखी नसतात. तशी सर्वच माणसे ही सारखी नसतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. प्रत्येकाचे वागणे वेगळे असते. या माणसांची पारख ही करावीच लागते. सदगुरु शिष्याची निवड करताना अशी पारख करतात. त्याची परिक्षा घेतात. तो परिक्षेत पास झाला तरच त्या पदासाठी तो योग्य ठरतो. शिष्यामधील गुण जाणून घेऊनच मग त्याला दिक्षा दिली जाते. अनुग्रह देताना शिष्याची आवड, निवड, त्याची भक्ती, आराधना, उद्देश, अवधान आदी सर्व गोष्टींची परिक्षा सदगुरु घेतात.

अवधान हे अध्यात्मामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे. जो अवधान देतो तो निश्चितच त्या पदास पोहोचतो. सदगुरु शिष्याच्या गुणांची खात्री करतात अन् मगच त्याला त्यांच्या हृदयात स्थान देतात. यासाठी शिष्याने योग्य ती काळजी घेऊन अभ्यास करायला हवा. साधना करायला हवी. तरच आत्मज्ञानाचा ठेवा त्याला मिळू शकेल.

ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।
संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अभ्यास एक तरी ओवी अनुभवावी असा या ग्रुपचा उद्देश आहे. मग होताय ना सहभागी..त्यासाठी लिंकवर क्लिक करा.
https://www.facebook.com/groups/ShriDnyneshwariStudy

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

5 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

6 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

15 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

15 hours ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

1 day ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

2 days ago