काय चाललयं अवतीभवती

साहित्यिक महादेव मोरे यांना आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार जाहीर

बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालय संस्थेतर्फे देण्यात येणारा यंदाचा प्रतिष्ठेचा ‘आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार-२०२२’ ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांना देण्याचा निर्णय कार्यकारी मंडळाने घेतला आहे, अशी माहिती कार्यवाह रघुनाथ बांडगी यांनी दिली आहे. २५ हजार रुपये , मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

हा परस्कार साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रथितयश लेखकास दरवर्षी देण्यात येतो. यापूर्वी ‘पानीपत’कार विश्वास पाटील, अरुण साधू (मुंबई), डॉ. जयसिंगराव पवार (कोल्हापूर), उत्तम कांबळे (नाशिक), कॉ. कष्णा मेणसे (बेळगाव), डॉ. सदानंद मोरे (पुणे), पद्मश्री मधु मंगेश कर्णिक (मुंबई), सतीश काळसेकर (मुंबई), कुमार केतकर (मुंबई), विष्णू सूर्या वाघ (गोवा), डॉ. आ. ह. साळुखे (सातारा), प्रा. डॉ. रावसाहेब कसबे (नाशिक), डॉ. राजन गवस (गारगोटी), मनस्विनी लता रविंद्र (मुंबई) व प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.

हा साहित्य पुरस्कार रविवारी (ता. १४ ) सायंकाळी पाच वाजता सार्वजनिक वाचनालयाचे सभागृह, गणपत गल्ली, बेळगाव येथे देण्यात येणार आहे.

महादेव मोरे यांच्यावरील डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

13 hours ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

14 hours ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

24 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

1 day ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

2 days ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

2 days ago