काय चाललयं अवतीभवती

विचारधारेशी नव्हे तर कायम वाचकांशी जोडलेले  राहील्यानेच मुंबई समाचारचे द्विशतक

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्रात मुंबई येथे मुंबई समाचारच्या ‘200 नॉट आऊट’ माहितीपटाचे प्रकाशन

मुंबई – केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज महाराष्ट्रात  मुंबई येथे मुंबई समाचारच्या ‘200 नॉट आऊट’ या माहितीपटाचे प्रकाशन केले. याप्रसंगी  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की कोणतीही संस्था विशेषतः स्थानिक वर्तमानपत्र दोन शतकांहून अधिक काळ चालवणे खूप कठीण आहे. मुंबई समाचारने विश्वासार्हतेचा आदर्श निर्माण केल्याचे ते म्हणाले. शाह म्हणाले की, अशी विश्वासार्हता मिळविण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. कोणत्याही विचारधारेशी न जोडलेला राजकारणी जसे चांगले काम करू शकत नाही, त्याप्रमाणे एखाद्या  विचारधारेशी संलग्न  कोणतेही वर्तमानपत्र चांगले काम करू शकत नाही असे ते म्हणाले.  ते म्हणाले की, मुंबई समाचार कोणत्याही विचारधारेशी जोडलेले न राहता कायम वाचकांशी जोडलेले  राहून  सत्य त्यांच्यापर्यंत पोहोचवत राहिले आहे .

अमित शहा म्हणाले की, दीर्घकाळ वर्तमानपत्र चालवणे आणि पत्रकारितेच्या उद्दिष्टांशी निष्ठा राखत काम करत राहणे हे अत्यंत कठीण काम आहे, जे मुंबई समाचारने साध्य केले आहे.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, अल्पसंख्याकांमध्ये जर कुणी अल्पसंख्याक असतील  तर ते पारशी बांधव आहेत. ते म्हणाले की, अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या लोकांनी पारशी समुदायाकडून शिकले पाहिजे, जे  केवळ कर्तव्य पार पाडण्यासाठी आपले जीवन जगतात आणि ज्यांनी कधीही कोणतीही मागणी न करता प्रत्येक क्षेत्रात योगदान दिले आहे. मुंबई समाचारच्या माध्यमातून पत्रकारितेतील कामा परिवाराचे हे  योगदान गुजरात, गुजराती आणि भारत कधीही विसरू शकत नाही असे ते म्हणाले. जेव्हा मुंबईचे नाव बॉम्बेवरून बदलण्यात आले तेव्हा न्यायालयात सादर करण्यात आलेला सर्वात मोठा पुरावा म्हणजे मुंबई समाचार हे शीर्षक होते असे ते  म्हणाले. अमित शहा म्हणाले की, मुंबई समाचार हे आशियातील सर्वात जुने आणि जगातील तिसरे सर्वात जुने वर्तमानपत्र आहे. आणि  जगातील हे एकमेव वर्तमानपत्र आहे ज्याने आपली विश्वासार्हता कायम राखली  आहे असे  ते म्हणाले.

50 मिनिटांचा हा माहितीपट एका मिनिटाचेही संकलन  न करता हिंदी आणि इंग्रजीमध्ये डब करण्यात यावा असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. यामुळे संपूर्ण देशाला समजेल की हे स्थानिक भाषेतील वर्तमानपत्र दोन शतके उलटूनही  अजूनही कार्यरत आहे  आणि तिसरे शतक पूर्ण करण्यासाठी तयार आहे असे  ते म्हणाले.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

1 day ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

2 days ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

2 days ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

3 days ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

4 days ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

4 days ago