नैसर्गिक वातावरणात या भाज्यांची वाढ होत असल्याने त्यांची चवही नष्ट होत नाही. यामुळे आरोग्यासाठी रानभाज्या या निश्चितच उपयुक्त ठरतात. यासाठी रानभाज्यांबाबत जनजागृतीची गरज आहे.


मानवाच्या आहारात असणाऱ्या बहुतांश वनस्पतींची शेतात लागवड केली जाते. मात्र लागवड न करताही जंगलात आढळणाऱ्या बहुतांश वनस्पती या मानवी आहारात वापरल्या जातात. तणे, कंद यासारख्या अनेक वनस्पती ऋतुनुसार आपसुक वाढतात. अशा भाज्यांना रानभाज्या असे म्हटले जाते. सध्या यातील काही भाज्यांची आता लागवडीही केली जाऊ लागली आहे. आरोग्यदायी रानभाज्या या पुस्तकात अशाच निवडक ६१ रानभाज्यांची रंगीत छायाचित्रांसह सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

आरोग्यास पोषक ठरणाऱ्या रानभाज्यांच्या गुणधर्मांची सविस्तर माहितीही या पुस्तकात देण्यात आली आहे. तसेच रानभाज्यांपासून तयार केल्या जाणाऱ्या विविध रुचकर आणि पोषक पाककृतींचीही माहिती या पुस्तकात दिली आहे. रोजच्या आहारात या भाज्यांचा समावेश करून मधुमेह, पचनसंस्थेचे विकार, लठ्ठपणा अशा अनेक जीवनशैलीजन्य आजारांना अटकाव कसा करता येईल याविषयीचे मार्गदर्शनही यात केले आहे. निसर्गप्रेमी, आयुर्वेदप्रेमी, आहारातज्ज्ञ, अभ्यासक, शेतकरी व हॉटेल व्यावसायिक या सर्वांना हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरणारे आहे.

पावसाळ्यात रानभाज्या आपोआप उगवतात. त्यांच्या कीड, रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्याने रानभाज्या लागवडीचा विचार शेतकऱ्यांनी करायला हवा. कीटकनाशकांच्या फवारणीचा तसेच खतांचाही खर्च यामुळे कमी होतो. नैसर्गिक वातावरणात या भाज्यांची वाढ होत असल्याने त्यांची चवही नष्ट होत नाही. यामुळे आरोग्यासाठी रानभाज्या या निश्चितच उपयुक्त ठरतात. यासाठी रानभाज्यांबाबत जनजागृतीची गरज आहे.

रानभाज्यांपासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. अळूपासून आपणास फक्त अळूची वडीच हे माहीत आहे. पण अळूच्या देठाची भाजी, अळूगाठी भाजी, अळूची भगरा भाजी, अळकुड्यांची भाजी हे पदार्थ हे केले जातात. करमळ ही औषधी वनस्पती आहे. यापासून लोणचे तयार केले जाते. उसाच्या शेतात मोठ्या प्रमाणात तण म्हणून वाढणारे घोळ हे आरोग्यासाठी उपयुक्त आहे. घोळीच्या पानामध्ये हृदयविकार दूर ठेवण्यासाठी महत्त्वाचे असणारे ओमेगा -३ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असते. मग या घोळीची भाजी तण न म्हणता भाजीसाठी उपयोग केल्यास आरोग्यासाठी उपयुक्त ठरणार नाही का ? बांबूच्या कोंबाची भाजी केली जाते. शतावरीपासून सूप व शतावरीच्या कोंबाची भाजी केली जाते. असे रानभाज्यापासून करण्यात येणाऱ्या विविध पाककृतींचीही माहिती या पुस्तकात दिल्याने हे पुस्तक निश्चितच रानभाज्यांचे महत्त्व वाढवणारे आहे. शेतात उगवणारे तण हे सुद्धा उपयुक्त असते हे विचारात घेऊन त्यानुसार त्याचे महत्त्व जाणून घेऊन त्याचा योग्य वापर कसा करता येईल याबाबत जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी हे पुस्तक निश्चितच प्रबोधन करणारे असे आहे.

पुस्तकाचे नाव – आरोग्यदायी रानभाज्या
लेखक – डॉ. मधुकर बाचुळकर
प्रकाशकसकाळ प्रकाशन
पृष्ठे – १६० किंमत – 195 रुपये

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

12 hours ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

18 hours ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

1 day ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

2 days ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

3 days ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

3 days ago