काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी लेखकप्रकाशक यांचेकडून पुस्तके मागवणेत येत आहेत. कादंबरी, कथासंग्रहबालसाहित्य या तीन साहित्य प्रकारांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत, अशी माहिती गारगोटी येथील लेखक बा. स. जठार यांनी दिली आहे.

देण्यात येणारे पुरस्कार असे –

राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार –
सदाशिव धों. जठार यांचे स्मरणार्थ कादंबरीसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 2001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे आहे तर आकुबाई स. जठार यांचे स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 1501, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे आहे. या व्यतिरिक्त कादंबरीसाठी दोन विशेष पुरस्कार देण्यात येणार असून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.

राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार
यशवंत आ. इंदुलकर यांचे स्मरणार्थ उत्कृष्ठ कथासंग्रहासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 2001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे तर सरस्वती य. इंदुलकर यांचे स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 1501, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे आहे. या व्यतिरिक्त कथासंग्रहासाठी दोन विशेष पुरस्कार देण्यात येणार असून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

राज्यस्तरीय उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार –
दत्तात्रय स. जठार यांचे स्मरणार्थ उत्कृष्ठ बालसाहित्यासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह तर तातोबा द. पोवार यांचे स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह तसेच आकुबाई स. जठार यांचे स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे आहे.

लेखक, प्रकाशक यांनी 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती व लेखकाचा अल्पपरिचय 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोहोचतील अशा रितीने पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी लेखक बा. स. जठार यांच्याशी ( 9850393996, 9420436256 ) संपर्क साधावा.

पुस्तके पाठवणेचा पत्ता – सौ. रंजना बा. जठार, विद्यासागर निवास, शिंदेवाडी रोड, गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर – 416209

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

44 minutes ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

14 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

18 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago