📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 19, 2026
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

Call for submission of books for State Level Literary Award

राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी लेखकप्रकाशक यांचेकडून पुस्तके मागवणेत येत आहेत. कादंबरी, कथासंग्रहबालसाहित्य या तीन साहित्य प्रकारांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत, अशी माहिती गारगोटी येथील लेखक बा. स. जठार यांनी दिली आहे.

देण्यात येणारे पुरस्कार असे –

राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार –
सदाशिव धों. जठार यांचे स्मरणार्थ कादंबरीसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 2001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे आहे तर आकुबाई स. जठार यांचे स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 1501, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे आहे. या व्यतिरिक्त कादंबरीसाठी दोन विशेष पुरस्कार देण्यात येणार असून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.

राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार
यशवंत आ. इंदुलकर यांचे स्मरणार्थ उत्कृष्ठ कथासंग्रहासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 2001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे तर सरस्वती य. इंदुलकर यांचे स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 1501, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे आहे. या व्यतिरिक्त कथासंग्रहासाठी दोन विशेष पुरस्कार देण्यात येणार असून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

राज्यस्तरीय उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार –
दत्तात्रय स. जठार यांचे स्मरणार्थ उत्कृष्ठ बालसाहित्यासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह तर तातोबा द. पोवार यांचे स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह तसेच आकुबाई स. जठार यांचे स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे आहे.

लेखक, प्रकाशक यांनी 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती व लेखकाचा अल्पपरिचय 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोहोचतील अशा रितीने पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी लेखक बा. स. जठार यांच्याशी ( 9850393996, 9420436256 ) संपर्क साधावा.

पुस्तके पाठवणेचा पत्ता – सौ. रंजना बा. जठार, विद्यासागर निवास, शिंदेवाडी रोड, गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर – 416209

Related posts

चित्रकार वासुदेव कामत यांना मराठी यशवंत पुरस्कार

गारगोटीच्या अक्षरसागर साहित्य मंचचे राज्यस्तरीय पुरस्कार 2024 जाहीर

गांधी विचार जागर कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406