शेती पर्यावरण ग्रामीण विकास

तीन दिवस महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाची शक्यता !

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

१- ढगाळ वातावरण-

                उद्या सोमवार दि. २ ते बुधवार दि. ४ फेब्रुवारी पर्यंतच्या ३ दिवसात महाराष्ट्रातील संगमनेर, अकोला, कोपरगांव, राहता, सिन्नर, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड, सटाणा, कळवण, देवळा, मालेगाव, धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर आदी तालुके व नंदुरबार व जळगांव जिल्हे व लगतच्या परिसरात केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी झालाच तर २ ते ४ मिमी. इतक्या अगदी किरकोळ हलक्या पावसाची शक्यता जाणवते. गुरुवार दि. ५ फेब्रुवारी पासुन मात्र लगेचच ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता जाणवते.

२- फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यातील तापमान-

शनिवार दि. ७ फेब्रुवारी पर्यन्तच्या आठवड्यात महाराष्ट्रात पहाटे ५ च्या किमान तापमानाचा पारा फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यातील त्याच्या ह्या काळातील सरासरी तापमानापेक्षा ३ ते ४ डिग्रीने अधिक राहून थंडी ऐवजी उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्र तील १३ जिल्ह्यात थंडी ऐवजी रात्रीचा उकाडा जाणवेल.  उर्वरित महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यात मात्र पहाटे ५ च्या किमान तापमानाचा पारा सरासरी इतका राहून संमिश्र वातावरणाच्या अनुभवातून केवळ माफक थंडीची शक्यता जाणवते.

३-उर्वरित फेब्रुवारी महिन्यातील महाराष्ट्रातील थंडी-

फेब्रुवारी महिन्यातील उर्वरित ३ आठवड्यात महाराष्ट्रात थंडी जाणवेल, परंतु मुंबईसह संपूर्ण कोकण खान्देश व मध्य महाराष्ट्र व छ. सं. नगर व जालना अश्या १९ जिल्ह्यात मात्र थंडीचे प्रमाण मात्र कमी असेल.

४- फेब्रुवारी महिन्यातील महाराष्ट्रातील दिवसाचे  कमाल तापमान –

                     नाशिकअहिल्यानगर असे दोन जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांत दुपारी ३ चे दिवसाचे कमाल तापमान सुद्धा दरवर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात जाणवणाऱ्या कमाल तापमानापेक्षा, ह्यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात दुपारचे कमाल तापमान अधिक असेल. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात दुपारीही उन्हाचा चटका जाणवेल. त्यामुळे रब्बीच्या बागायती शेत पिकांनाही ह्या महिन्यात अधिक सिंचनाच्या आवर्तनाची गरज भासण्याची शक्यता जाणवेल.

५–उर्वरित फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे काय?
       
संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात भागानुसार पावसाचे प्रमाण सहसा शून्य ते १० मिमी.असते. चालु २०२६ च्या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, भंडारा असे ६ जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यात पावसाची शक्यता ही सरासरी पेक्षा म्हणजे १० मिमी पेक्षा कमी असेल. म्हणजेच  संपूर्ण महिना  जवळपास  पावसाविना कोरडा जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, भंडारा जिल्ह्यांत मात्र सरासरी इतक्या म्हणजे शून्य ते १० मिमी किंवा त्या पेक्षा कमी इतक्या किरकोळ पेंडकळवनी पावसाची शक्यता जाणवते. रब्बी पिकांच्या बाबतीत ही एक जमेची बाजू समजावी.

६-👆 असे वातावरण कश्यामुळे झाले?👇

नेहमी जम्मू काश्मिर, लेह लडाख ह्यांच्या अक्षवृत्तांवरून पश्चिमेंकडून पूर्वेकडे जाणारे पश्चिमी प्रकशोभ सध्या ह्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अधिक दक्षिणेकडे म्हणजे पंजाब राजस्थान राज्यांच्या अक्षवृत्तांवरून पश्चिमेंकडून पूर्वेकडे जातांना, वाहणारे थंड व कोरडे वारे खान्देश सह  सध्या उत्तर महाराष्ट्रापर्यन्त पोहोचले आहे. शिवाय ह्या बरोबरच सध्या महाराष्ट्रावर प्रत्यावर्ती चक्रीय वारे स्थित असल्यामुळे, बंगाल उपसागरातील वाहून येत असलेली आर्द्रता ह्या थंड वाऱ्यात मिसळत आहे. म्हणून खान्देश सह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावर ढगाचे सावट आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

14 hours ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

20 hours ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

2 days ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

2 days ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

3 days ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

3 days ago