शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जळगांव, जेऊर, नाशिक, यवतमाळला थंडीची लाट ! तर ‘कोकणातही थंडी !

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणीशेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

थंडीची लाट जाणवणारी ठिकाणे –
ठिकाण, किमान तापमान ( सरासरीच्या खाली).👇
जळगांव ६.९(-४.९), जेऊर ५ (-५.६), नाशिक- ७.८(-४.५), यवतमाळ ८.०(-५.९)

थंडीच्या लाटे सदृश्य स्थिती असणारी ठिकाणे गोंदिया ८.४(-४.१), वाशिम ९.६ (-४.१),                
  डहाणू १५.१(-३.५),   मुंबई(सांताक्रूझ) १४.९(-३.६) तसेच अहिल्यानगर, पुणे, सातारा, नांदेड

मुंबईसह कोकणातही पारा उतरतोय !

मुंबईसह कोकणात पहाटे ५ चे किमान तापमान हे सरासरी किमान तापमानाच्याही खाली सध्या घसरत आहे. मुंबई(सांताक्रूझ) १४.९(-३.६), डहाणू १५.१(-३.५), रत्नागिरी १६.१(-३.८) येथे किमान तापमान लक्षणीय खालावले आहे. तर इतर ठिकाणी पारा सरासरी किमान तापमानाच्या खाली एक डिग्रीच्या आसपास खालवले आहे.

पुढील ८ दिवस अजूनही थंडीचेच –

शुक्रवारपासुन पुढील ८ दिवस म्हणजे १९ डिसेंबर ( मार्गशीर्ष दर्शवेळ आमावस्ये)पर्यन्त महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवण्याची शक्यता आहे. परंतु मंगळवार दि. १५ ते गुरुवार दि. १७ डिसेंबर दरम्यानच्या तीन दिवसात केवळ काहीशी थंडी कमी होवु शकते

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

4 hours ago

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

17 hours ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

18 hours ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

1 day ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

2 days ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

2 days ago