विश्वाचे आर्त

आत्मज्ञानाच्या दिपावलीसाठीच ज्ञानेश्वरी पारायणे

गेल्या सात दशकात ज्ञानेश्वरी मात्र टिकून राहीली कारण त्यात ज्ञान सांगितले आहे. ज्ञानासाठी त्याचे वाचण केले जाते. त्याची पारायणे केली जातात. यामुळे हा ग्रंथ आजही मराठीत टिकूण आहे. बदलत्या काळातही हे ज्ञान उपयुक्त असे आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

सूर्ये अधिष्ठिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची ।
तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची । दिवाळी करी ।। 12 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ – ज्याप्रमाणे सूर्याने पूर्व दिशेचा अंगीकार केला म्हणजे ती दिशा जगाला प्रकाशाचे राज्य देते, त्याप्रमाणे ज्या दैवाच्या योगाने वाचा श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करते.

दिपावली हा सण अंधार दूर करणारा. जीवनात प्रकाश आणणारा असा आहे. पूर्व दिशेला सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा त्याची येण्याची चाहूल ही पहाटेपासूनच लागते. अंधार हळूहळू दूर करत सर्वत्र प्रकाश होतो. जीवनातही अचानक ज्ञानाचा उजेड पडत नाही. हळूहळू उजेत पडतो. अज्ञान हळूहळू दूर होते. जसे प्रकाशाचे राज्य सर्वत्र पसरते तसे आयुष्यात ज्ञानाच्या प्रकाशाचे राज्य येते.

पूर्वीच्या काळी नागरिकात भीती असायची. संध्याकाळ होण्या आधी घरी परतावे लागे. कारण रात्र झाल्यानंतर अंधारात मार्ग काढणे सोपे नसायचे. तर वन्यप्राण्यापासूनही धोके असायचे. अधाराचा फायदा घेत दुर्घटना घडण्याचाही धोका असायचा. वीजेची सोय नव्हती आणि दिव्यांचा प्रकाशात सर्व रात्र काढावी लागत असे. अधाराचे साम्राज्य हे भीती वाढवणारे होते. अशा या भीतीतूनच नवनवे शोध लावण्याचे प्रयत्न झाले. अंधार दूर करण्यासाठीच प्रयत्न केले गेले. ज्ञानानेच हा प्रकाश पडला.

मराठी भाषा ज्ञान भाषा व्हावी असे वारंवार सांगितले जाते. कारण ज्ञान भाषा झाली तरच ती भाषा शाश्वत होते. अन्यथा ती भाषा नष्ट होते. मराठी बाबतही हाच नियम आहे. नवनव्या तंत्रज्ञानात भाषेचा वापर वाढला तरच त्या भाषेचे संवर्धन होईल. मुळात मराठी ही ज्ञान भाषा आहे. ज्ञानेश्वरीच्या रुपातून हे ज्ञान गेली सातशे-आठशे वर्षे मराठीत नियमित सांगितले जात आहे. अनेक धार्मिक ग्रंथ आले अन् गेलेही पण गेल्या सात दशकात ज्ञानेश्वरी मात्र टिकून राहीली कारण त्यात ज्ञान सांगितले आहे. ज्ञानासाठी त्याचे वाचण केले जाते. त्याची पारायणे केली जातात. यामुळे हा ग्रंथ आजही मराठीत टिकूण आहे. बदलत्या काळातही हे ज्ञान उपयुक्त असे आहे. ज्ञानाचे अमरत्व ज्ञानेश्वरीत सांगितले असल्यानेत ती आजही टिकूण आहे. त्या ज्ञानाचा सुकाळ या मराठी नगरीत करण्याचे स्वप्न ज्ञानेश्वरांना पाहीले आहे. यामुळे ही भाषा आजही ते ज्ञान वाटत आहे. या ज्ञानाचा प्रकाश पाडून सर्वत्र दिपावली साजरी व्हावी.

ज्ञानेश्वरीचे पारायण हे ज्ञान मिळवण्यासाठीच करावे. जीवनातील अंधार दूर करण्यासाठी करावे. आत्मज्ञानाचा प्रकाशातून जीवनाचे सार्थक करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. प्रकाश अंधार दूर करतो. त्या उजेडात आपण उत्तम कार्य करू शकतो. कामात सुलभता येते. तसे शब्दाचा प्रकाश अज्ञान दूर करतात. त्या ज्ञानाच्या प्रकाशात आपला जीवन प्रवास उत्तमप्रकारे करू शकतो. याच ज्ञानासाठी ज्ञानेश्वरी वाचायला हवी. ती अनुभवायला हवी. जीवनात ज्ञानाची दिवाळी साजरी करायला हवी.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

पुण्यात २८ जुलैला ‘तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान’ पुस्तकाचे प्रकाशन Contributions of Thanjavur Maratha Kings Book Publication

पुणे : तंजावरच्या मराठा साम्राज्याचा वैभवशाली इतिहास मराठी वाचकांसमोर आणणाऱ्या 'तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान'…

2 hours ago

धान्यांपासून लाखोंचा उद्योग ! एक्सट्रुजन तंत्रज्ञान बदलणार ग्रामीण उद्योजकतेचे चित्र ? From grains to a multi-million dollar industry

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका किंवा हरभरा… या पारंपरिक पिकांपासून आधुनिक, पौष्टिक आणि बाजारपेठेत मोठी मागणी…

12 hours ago

राजर्षी असो वा ब्राह्मण…मोक्षाचा खरा मार्ग कोणता? Whether a King sage or a Brahmin…what is the true path to salvation?

जीवनातील प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती आणि प्रत्येक विचार जर परमेश्वराच्या चरणी अर्पण झाला, तर माणसाच्या…

1 day ago

साखरेचा गोडवा वाढणार ? महाराष्ट्रात ऊस उत्पादनाने गाठला नवा टप्पा

महाराष्ट्रातील ऊस लागवड क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता यांचा तपशील क्षेत्र (लाख हेक्टरमध्ये), उत्पादन (लाख टनांमध्ये)…

1 day ago

लोकमान्य टिळक : स्वराज्याचा घोष आणि ज्ञानाचा अखंड दीपस्तंभ Lokmanya Tilak: The Voice of Swaraj

आज लोकमान्य टिळक यांचा जन्मदिवस आणि एक ऑगस्ट रोजी त्यांचा पुण्यतिथीचा दिवस आहे.'स्वराज्य हा माझा…

2 days ago

शिवकालीन जलनितीचा गोव्यातील सेतू Water Managment in Shivaji’s Era Book in Konkani

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सर्वश्रुत आहे; मात्र त्यांच्या दूरदर्शी जलनितीची चर्चा तुलनेने कमी होते.…

2 days ago