विश्वाचे आर्त

इंद्रियांनाच गुंतवा साधनेच्या स्वरात

हे विषय जयातें नाकळिती । तया सुख दुःखे न पवती ।
आणि गर्भवासुसंगती । नाही तया ।। १२३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय २ रा

ओवीचा अर्थ – या विषयांच्या तावडीत जो सापडत नाही, त्याला सुखदुःख ही दोन्ही होत नाहीत आणि गर्भवासाची संगती त्याला कधी घडत नाही.

विषयांच्या तावडीत आपण सापडणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. म्हणजे आपणास कसलाच त्रास होत नाही. साधनेत मन रमवायचे असते तर हे करणे आवश्यक आहे. विषयात आपण गुरफटलो तर आपण त्यातून बाहेर पडणे अवघड असते. इंद्रियामधून आपली सुटका करून घेणे आवश्यक आहे. यासाठीच ही इंद्रियेच साधनेमध्ये गुंतवायला हवीत.

चांगली घटना घडली की सुख, आनंद प्राप्त होतो. पण वाईट घटना घडल्यानंतर आपणास दुःख होते. आपण त्यात गुंतल्यामुळे आपणास सुख, दुःख होते. दुसऱ्याची कोणी निंदा केली अन् ते शब्द आपल्या कानावर पडले तर आपणास बरे वाटते, पण एखाद्याने त्याची स्तुती केली की आपणास चिड येते. वाईट वाटते. ही मानसाची वृत्ती आहे. चांगले-वाईट ऐकल्याने दोन्हीचाही आपल्या मनावर परिणाम होतो. सुंदर निसर्ग दृष्टीस पडल्यानंतर त्याचा आपल्या मनावर चांगला परिणाम होतो. मन प्रसन्न होते. पण तेच एखादी दुर्घटना पाहील्यानंतर मन हळहळते. मनाला दुःख होते. भयानक गोष्टी पाहील्यानंतर त्याचा वाईट परिणाम मनावर झालेला पाहायला मिळतो.

सुगंधी द्रव्याच्या वासाने मन प्रसन्न होते. पण तेच मन दुर्गंधीने विचलित होते. गोड पदार्थाने आनंद मिळतो तर तिखटाने मनातील तिखट भाव जागृत होतात. पण हे सर्व क्षणिक असते. ज्या त्या परिस्थितीनुसार हा परिणाम हा क्षणिक असतो. पण आपण त्यात गुंतत गेल्याने सुख-दुःखे अनुभवास येतात. विषय कसा आहे यावर हे सर्व अवलंबून असते. इंद्रियांना मिळालेल्या अनुभवावरून मनावर परिणाम होत असतो. यासाठी इंद्रिये नित्य अन् शाश्वत सुखात गुंतवायला हवीत अर्थातच ती साधनेत गुंतवायला हवीत. इंद्रियांना साधनेची गोडी लागली तर नित्य शाश्वत सुख अनुभवायास मिळते.

साधनेतील सोहमचा स्वर कानांनी ऐकायची सवय लावायला हवी. तो स्वर श्वासाने अनुभवायाल हवा. त्या स्वराचा स्वाद जीभेने चाखायला हवा. त्या स्वराचा स्पर्ष त्वचेने अनुभवायाला हवा. डोळ्यांनी त्या स्वराचे दर्शन घ्यायला हवे. म्हणजेच इंद्रियांनी तो स्वर अनुभवायाला हवा. यासाठीच या स्वरामध्ये इंद्रिये गुंतवायला हवीत. यातून मिळणारे सुख हे शाश्वत असते. मिळणारा आनंद हा उच्च कोटीचा असतो. यातूनच मग आपली आपणाशीच ओळख होते. अन् आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग सुकर होतो.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

12 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

1 day ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

1 day ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

1 day ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago

स्त्रीवादी साहित्याची नवी दिशा : डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांचे अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषण New direction of feminist literature

स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…

2 days ago