कविता

गुरु पौर्णिमा

प्रत्येकाला आयुष्यात भेटतोच गुरु
तोच वाहून नेतो शिष्याचे तारु…

गुरु रचतात जीवनाचा पाया
म्हणून तर शिष्याची उजळती काया..

गुरु देतात ज्ञान ,शिक्षण
शिष्यांचे होते म्हणून रक्षण…

गुरु रचतात भविष्याचा पाया
शिष्यांना मिळते आयुष्य भर छाया..

गुरुजी देतात संस्कार छान
त्यांच्यामुळेच समाजात मिळे मान…

गुरु शिष्यांना लावतात लळा
म्हणून फुलतो ज्ञानाच मळा…

गुरुजी शिकवतात परीस्थितीशी लढायला
कधीच आवडत नाही त्यांना शिष्यांनी रडायला….

गुरुजी आहेत माझा खरा आदर्श
त्यांचा आहे माझ्या जीवनाला स्पर्श…

गुरुजी म्हणजे,प्रेम वात्सल्य
त्यांच्या पुढे होई श्रमाचे साफल्य…

कवी – सीमा मंगरूळे तवटे, वडूज – सातारा

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

सृष्टी निर्माण झाली कशी? श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले गूढ काय?

सृष्टीकडे पाहिले की असंख्य रूपे, जीव, शक्ती आणि घडामोडी आपल्याला दिसतात. या विराट पसाऱ्यामागे नेमकी…

1 day ago

सर्व महामानवांच्या सामर्थ्याची बेरीज म्हणजे भारत: डॉ. श्रीपाल सबनीस

कोल्हापूर : भारत हा कोणत्याही एका महामानवाचा,एका धर्माचा किंवा एका विचारपरंपरेचा नाही. बुद्ध, महावीर, संत…

1 day ago

अंदाजाची शेती संपणार? ड्रोन, सेन्सर अन् एआय ठरवणार पिकांचे भवितव्य ! Smart Farming with Drone and AI Techique

डिजिटल क्रांती: समृद्ध शेतीचा पाया/ 'स्मार्ट शेती, भरघोस प्रगती' ड्रोनची फवारणी, मोबाईलवर मातीचे रिपोर्ट आणि…

1 day ago

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे (नाशिक)यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार,संहिता राजन (पुणे)…

1 day ago

२२ परीक्षा रद्द, दोन हजार नोकऱ्या मात्र धोक्यात!

स्टेटलाइन - झारखंडच्या राजकारणात सध्या सत्तेच्या खुर्चीपेक्षा विद्यार्थ्यांच्या संतापाची ताकद मोठी ठरताना दिसत आहे. रांचीच्या…

2 days ago

३६ हजार बंद उद्योगांचे वास्तव!

विशेष आर्थिक लेख. महाराष्ट्रातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या गेल्या पाच वर्षांत बंद झाल्याची माहिती संसदेत…

3 days ago