गप्पा-टप्पा

आय. सी. ८१४ विमान अपहरणाचे नाट्य

जमिर या हिंदी चित्रपटातला शेवट हा माझ्या कादंबरीच्या शेवटाशी जुळणारा आहे. म्हणूनच शेवट आताच सांगत नाही. तुम्ही पण कोणाला हा शेवट सांगू नका आणि प्रारंभ चुकवू नका. पाकिस्तानच्या अभ्यासामुळेच केवळ मला ही कादंबरी जमली

अरविंद व्यं. गोखले

वास्तविक मला आय. सी. ८१४ या माझ्या कल्पास्तवाची ही ई आवृत्ती निघेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. त्यासाठी मला पहिल्यांदा नेटफ्लिक्सचे आभार मानायला हवेत. आता हेच पाहा ना, आय. सी. ८१४ ही कादंबरी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाच्या अपहरणाच्या नाट्यावर अक्षरश: दोन-तीन आठवड्यात लिहून मी पूर्ण केली.

२४ डिसेंबर १९९९ रोजी सुरु झालेले हे अपहरणाचे नाट्य ३१ डिसेंबर १९९९ च्या उत्तररात्री म्हणजे २००० च्या पहाटे संपले. आय. सी. ८१४ विमानाचं अपहरण झालं, तेव्हा ‘एन्टेबी’सारखी कारवाई केली जाईल, असं अनेकांना वाटत होतं. गुप्तचरांच्या आघाडीवर तशी तयारी होती, पण माशी कुठे शिंकली ? अमृतसरच्या राजा सांसी विमानतळावर कमांडोजचं पथक पोहोचलं, पण दरम्यान ‘इंडियन एअरलाइन्सच्या विमानानं लाहोरच्या दिशेनं उड्डाण केलं होतं. त्या कारवाईत विघ्न आणणारे कोण होते ? तो खोटा फोन कोणाचा होता ? या आणि अशा बऱ्याच खळबळजनक माहितीवर आधारित काल्पनिक आणि वास्तव यांचा हा सुरेख ‘कल्पास्तव’. यात मांडला आहे. ते जसे घडले तसे या कादंबरीत म्हणजेच या कल्पास्तवात दाखवण्याचा प्रयत्न मी केला आहे. फक्त शेवट हा समस्त भारतीयांना जसा व्हावा असे मनातून वाटत होते तसा घडवलेला आहे. नेटफ्लिक्सने त्यावर काही भागांची मालिका काढली आणि त्यातल्या भोला, शंकर आदि पात्रांबाबत चर्चा सुरु झाली. ती खरी आहेत की ती अवास्तव आहेत, असे विचारले जाऊ लागले.

चॅनेलवरही त्याची चर्चा रंगली. मी माझ्या कादंबरीची आठवण ठेवून एक कहाणी माझ्या फेसबुक किनाऱ्यावर टाकली. ती वाचून काहीजणांनी माझी मुलाखत त्यांच्या त्यांच्या चॅनेलवर घेतली. त्याबरोबर अनेकांनी ही कादंबरी आपण मागे वाचली, पण आता आठवत नसल्याचे सांगितले. अनेकांना ती पुन्हा वाचाविशी वाटली, माझ्या या कादंबरीची उजळणी कराविशी वाटली, यातच या कादंबरीची तथा या कल्पास्तवाची किमया म्हणायला हवी. त्यातच माझे स्नेही निनाद प्रधान यांनी त्याबद्दलचा आग्रह धरला म्हणूनच केवळ ती पूर्ण करता आली.

जमिर या हिंदी चित्रपटातला शेवट हा माझ्या कादंबरीच्या शेवटाशी जुळणारा आहे. म्हणूनच शेवट आताच सांगत नाही. तुम्ही पण कोणाला हा शेवट सांगू नका आणि प्रारंभ चुकवू नका. पाकिस्तानच्या अभ्यासामुळेच केवळ मला ही कादंबरी जमली आणि अल्पावधीत ती पद्मगंधा प्रकाशनाने प्रसिद्ध केली. तब्बल चोवीस वर्षांपूर्वीची ती कहाणी जशीच्या तशी पुन्हा एकदा वाचकांसमोर वेगळ्या स्वरूपात येत आहे. आपण तिचा आनंद घ्याल ही खात्री आहे.

सध्या नेटफ्लिक्सवर आणि चर्चेत असलेला चित्रपट आय सी ८१४ हा कोणाच्या कथाकल्पनेवर आधारित आहे ते माहिती नाही, पण ही कादंबरी सर्वप्रथम मी लिहिली. घटना घडते तेव्हा या कादंबरीचा म्हणजेच कल्पास्तवाचा नायक म्हणजे एका वृत्तपत्राचा संपादक आहे आणि कादंबरी फुलवण्यासाठी त्या संपादकाचा मुलगा आणि सून हे त्या विमानात आहेत असे वर्णन त्यात आहे. बाकी ज्यांची चर्चा आहे ती पात्रे काझी ऊर्फ बर्गर, इब्राहिम अतहर म्हणजे चीफ, शाहिद अख्तर सईद म्हणजे डॉक्टर, मिस्त्री झहूर इब्राहिम म्हणजे भोला आणि शकीर ऊर्फ गोपाळ वर्मन म्हणजे शंकर ही पात्रे मूळ घटनेनुसारच आहेत. मी स्वत: त्या घटनेच्या वेळी केसरीचा संपादक असल्याने ती घटना अनुभवत होतो. घटना घडली तो दिवस २५ डिसेंबर १९९९ आणि संपली तो दिवस १ जानेवारी २००० आणि कादंबरी प्रकाशित झाली तो दिवस २० एप्रिल २०००. कादंबरीचे मुखपृष्ठ माझे सहकारी सुरेंद्र पाटसकर यांचे तर प्रकाशक आहेत पद्मगंधा प्रकाशन पुणे. माझे मित्र अरूण जाखडे यांच्या प्रयत्नातून ते साकारले.

पुस्तकाचे नाव – आय. सी. ८१४
लेखकअरविंद गोखले
प्रकाशक – मराठीसृष्टी
किंमत – १०० रुपये सवलत किंमत – ७५ रुपये
पुस्तकाच्या खरेदीसाठी करा लिंकवर क्लिक –
https://marathibooks.com/books/ic814-by-arvind-gokhale/

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

ओअँसिसचा हिरवा श्वास अन् सहाराच्या वादळाचा काळा कहर The green breath of the oasis

सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…

3 hours ago

क्षणाचाही विलंब नको : ज्ञानेश्वरीतील संन्यासयुक्तीचा सहज, सोपा आणि जीवनाला दिशा देणारा संदेश A message that gives direction to life

"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…

8 hours ago

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

2 days ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

2 days ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

3 days ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

4 days ago