काय चाललयं अवतीभवती

दलित चळवळीच रूपांतर आर्थिक विकासाच्या चळवळीत करण्यासाठी रामदास आठवलेंचा पुढाकार

दलित चळवळीचे रूपांतर आर्थिक विकासाच्या चळवळीत होण्यासाठी रामदास आठवलेंनी पुढाकार घेतला: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार-2024 च्या वितरण प्रसंगी नागपुरात प्रतिपादन

नागपूर – दलित समाजासाठी काम करतांना  दलित शोषित समाजाला न्याय देण्याचं काम रामदास आठवले यांनी केले असून  दलित चळवळीच रूपांतर आर्थिक विकासाच्या चळवळीत होण्यासाठी रामदास आठवलेंनी पुढाकार  घेतला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग  मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर मध्ये केले.

मारवाडी फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना  नागपूरच्या सिविल लाईन्स स्थित चिटणवीस सेंटर येथील बनयान सभागृहामध्ये  गडकरी यांच्या हस्ते देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. मारवाडी फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी  या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. या पुरस्काराच स्वरूप पाच लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडन येथील स्मारक, मुंबईच्या इंदू मिलच्या जागेत साकार होत असलेले डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक या प्रकल्पांसाठी  रामदास आठवले यांनी    सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांचे सामाजिक आणि राजनीती कार्य हे मोठे आहे असे देखील गडकरी यांनी यावेळी नमूद केले. सामाजिक ,राजकीय, साहित्यिक अशा सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचे काम गिरीश गांधी करत असल्याचे देखील गडकरी यांनी अधोरेखित केले. 

याप्रसंगी  सत्काराला उत्तर देताना आठवले यांनी सांगितले  की,  मी दलित पॅंथर सारख्या अन्यायाविरोधात विद्रोहाची भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या, साहित्यिकांच्या चळवळीतून पुढे आलो असून आम्हाला समाजामध्ये प्रॅक्टिकल आंबेडकरीझम – व्यावहारिक आंबेडकरवाद रुजवायचा आहे.  संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महत्त्वाची भूमिका होती , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील भाषण,  गोलमेज परिषदेतील भाषण आजही  लोकांच्या लक्षात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व रुजवण्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आज पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संस्थातून सुमारे  1 लाख विद्यार्थी अनेक  विद्याशाखेंमध्ये शिक्षण घेत असल्याचे देखील आठवले यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला मारवाडी फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

ओअँसिसचा हिरवा श्वास अन् सहाराच्या वादळाचा काळा कहर The green breath of the oasis

सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…

2 hours ago

क्षणाचाही विलंब नको : ज्ञानेश्वरीतील संन्यासयुक्तीचा सहज, सोपा आणि जीवनाला दिशा देणारा संदेश A message that gives direction to life

"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…

7 hours ago

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

2 days ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

2 days ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

3 days ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

4 days ago