गप्पा-टप्पा

स्त्री भ्रुण हत्या थांबून मुलीचे स्वागत व्हावे या उदात्त हेतूनेच पुस्तकाची निर्मिती…

पुस्तकाच्या हेतु बद्दल डॉ उज्ज्वला मुसळे यांची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी ऑडिओवर क्लिक करा..

आपण सध्या काय करता ? आपल्या बद्दल थोडक्यात…

उज्वला मुसळे – सध्या मी औरंगाबाद येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर म्हणून कार्यरत आहे. चिपळूण येथे असताना मी मुंबई विद्यापीठातून बी. एस. सी. पदवी घेतली त्यानंतर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून एलएलबी, एलएलएम आणि पीएचडी पूर्ण केली. तसेच मानवी हक्क आणि एडीआर यातून डिप्लोमा पूर्ण केला आहे. 2009 मध्ये स्पर्धा परिक्षेतून मी दिवाणी न्यायाधीश क. स्तर म्हणून रुजू झाले. पंढरपूर, कोल्हापूर, वाशिम येथे काम केले. 2019 मध्ये वरिष्ठ स्तर न्यायाधीश म्हणून प्रमोशन मिळाले. या व्यतिरिक्त कोल्हापूर आणि वाशिम येथे मी बाल न्याय मंडळाचे कामही पाहिले आहे. रत्नागिरी लॉ महाविद्यालयात मी प्राध्यापक म्हणून सुद्धा काम केले आहे. माझ्या संशोधनावरच आधारित “महाराष्ट्राच्या विशेषसंदर्भात गर्भधारणा पूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र अधिनियम १९९४ च्या अंमलबजावणीसाठी न्यायव्यवस्थेची भूमिका” हे पुस्तक इंग्रजीमधून प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक लवकरच मराठीतही येत आहे.

“महाराष्ट्राच्या विशेषसंदर्भात गर्भधारणा पूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र अधिनियम १९९४ च्या अंमलबजावणीसाठी न्यायव्यवस्थेची भूमिका” हे पुस्तक लिहावे असे आपणास का वाटले ?

उज्वला मुसळे – वर्षानुवर्षी एकच विषय घेऊन त्यावर विचार करणे त्यावर संशोधन करणे आणि त्यानंतर त्याबद्दल अभिव्यक्त होणे. हे ध्यास घेतल्याशिवाय शक्य नव्हते. या ध्यासातूनच हे पुस्तक लिहिले गेले. शिक्षणामुळे समाज विकसित व्हावा, मन उदार, स्वागतशील व स्वीकारशील व्हावे. हृदयात माणुसकीचा नंदादीप देवत राहावा असे अपेक्षित, पण घडते आहे सर्व विपरीतच. वंशाला दिवा हवा म्हणून माणसं मुलींचा जन्म नाकारू लागले हा सुसंस्कृत म्हणवणाऱ्या समाजाचा, पुरोगामी म्हणवणाऱ्या व्यवस्थेचा खूप मोठा पराभव आहे. समाजातील काही हैवाणी प्रवृत्ती स्त्री भ्रुण हत्येला हातभार लावत आहेत. शिक्षित समाजाची ही शोकांतिकाच आहे. यासाठी यावर प्रबोधनाच्या हेतूने हे पुस्तक लिहिले गेले आहे.

हे संशोधनपर पुस्तक आहे. त्यासाठी आपण कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला ?

उज्वला मुसळे – समाजाने लेकीच्या जन्माचे स्वागत करावे हा उद्देश ठेवून हे पुस्तक लिहीले गेले. हे संशोधनपर पुस्तक आहे. त्यासाठी प्राचीन वैदिक काळापासून ते अत्याधुनिक काळापर्यंत संदर्भ साहित्याचा दांडोळा घेतला. इतिहासाचा, पुराणाचा फेरफटका मारला आणि त्या सगळ्यांच्या उजळणीतून हे पुस्तक तयार झाले.

हे पुस्तक मराठीमध्ये भाषांतरीत करावे असे आपणास का वाटले ?

उज्ज्वला मुसळे – गार्गी, मैत्रेयी यांच्यासारख्या हुशार अन् प्रवाह विरुद्ध जाणाऱ्या धाडसी महिलांच्या देशात मुलगी ही वंशाचा दिवा होऊ शकते हे पटवून द्यायची वेळ यावी हे दुर्दैवच म्हणावे लागेल. बाहेरून कितीही पाणी ओतले किंवा पोषक खते घातली तरी जमीनतून जोवर बीज ओढून घेत नाही. तोवर ते रुजत नाही आणि आकाशाकडे झेपावणारा अंकुरही फुटत नाही. तळागाळातील मुली, महिला यांच्यापर्यंत पोहोचायचे तर त्यांच्या भाषेत बोलायला हवे, तसे केले तरच हा विचार सर्वत्र पोहोचणार व रुजणार आहे. म्हणूनच हे पुस्तक आता मराठीमध्ये लवकरच प्रकाशित करणार आहे. या जनजागृतीतून लेक जन्माला आल्यावर दाराला तोरण लावून अन् गुढ्या उभारून तिचे स्वागत नवी पिढी निश्चित करेल अशी आशा वाटते.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तेंगबोचेची खडतर अन् रम्य वाट.. The difficult and beautiful path to Tengboche

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी भाग - ६ एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या प्रवासातील तेंगबोचेकडे जाणारा टप्पा म्हणजे हिमालयाच्या…

3 hours ago

ओअँसिसचा हिरवा श्वास अन् सहाराच्या वादळाचा काळा कहर The green breath of the oasis

सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…

17 hours ago

क्षणाचाही विलंब नको : ज्ञानेश्वरीतील संन्यासयुक्तीचा सहज, सोपा आणि जीवनाला दिशा देणारा संदेश A message that gives direction to life

"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…

21 hours ago

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

2 days ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

3 days ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

3 days ago