काय चाललयं अवतीभवती

हवे तसे जग निर्माण करणाऱ्या माध्यमांमुळेच वाचन अन् वाचनाधारित सभ्य समाज होतोय नष्ट

वाचन हे सर्वांगीण , बहुआयामी, बहुसांस्कृतिक जाणीवेने समृद्ध आणि संपन्न व्यक्तिमत्त्व तयार करणारे, कल्पकता वाढवणारे, जीवनाचे विविधांगी भान देत, सर्व धर्म, संस्कृती, माणसे यांचा समान आदर करायला शिकवणारे आणि सभ्य, सुसंस्कृत समाज निर्मिणारे माध्यम म्हणूनच हजारो वर्षे टिकलेले माध्यम आहे.

डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी
  • दूरचित्रवाणी, मोबाईल या सारखी नव तंत्रज्ञानाधारित माध्यमे पुस्तक वाचनाला कधीच पर्याय ठरू शकणार नाहीत
  • वाचन हे समग्र व्यक्तिमत्त्व आणि सभ्य, सुसंस्कृत समाज घडवण्याचे महत्त्वाचे माध्यम
  • डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे वक्तव्य

दूरचित्रवाणी, व्हाटस् अप, गुगल, मोबाईल या सारखी नवतंत्रज्ञानाधारित माध्यमे ही वाचन, ग्रंथ, पुस्तक या माध्यमाचा कधीच पर्याय होऊ शकत नाहीत कारण या माध्यमांचे हेतूच परस्परविरोधी आणि पूर्णतः भिन्न आहेत. वाचन हे सर्वांगीण , बहुआयामी, बहुसांस्कृतिक जाणीवेने समृद्ध आणि संपन्न व्यक्तिमत्त्व तयार करणारे, कल्पकता वाढवणारे, जीवनाचे विविधांगी भान देत, सर्व धर्म, संस्कृती, माणसे यांचा समान आदर करायला शिकवणारे आणि सभ्य, सुसंस्कृत समाज निर्मिणारे माध्यम म्हणूनच हजारो वर्षे टिकलेले माध्यम आहे. दूरचित्रवाणीसारख्या बाजार आणि बाजारू संस्कृतीला हवे तसे जग निर्माण करणाऱ्या माध्यमांमुळे वाचन आणि वाचनाधारित सभ्य समाज नष्ट केला जातो आहे. घराघरांतून मुलांवर वाचन संस्कार करणारा पालक त्यामुळे हरवला आहे, असे मत ज्येष्ठ कवी, संवाद – माध्यम तज्ज्ञ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पूर्वाध्यक्ष डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी धरमपेठ राजाराम वाचनालयातर्फे आयोजित एका कार्यक्रमात बोलतांना काढले.

धरमपेठ राजाराम वाचनालयाने मुलांसाठी संपूर्णपणे नि:शुल्क स्वरूपात पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. या वाचनालयाचे कार्यवाह अनिल चनाखेकर यांनी वाचनालयातील पुस्तके झोपडपट्ट्यांमध्ये नेत तेथील मुलांचे पुस्तके आणि वाचनाशी जे नाते जोडले होते त्याचे स्मरणही डॉ. जोशी यांनी करून दिले.

सुमारे पन्नास वर्षांपूर्वी वाचन संस्कृती, ग्रंथ संस्कार, मुलांपर्यंत पुस्तके पोहचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, शासनाची जिल्हा आणि विभागीय ग्रंथालये, शासनाचे ग्रंथालय संचालनालय हे सारे मिळून कशी धडपड करायचे, गावोगावी ग्रंथप्रदर्शने केली जायची, विभागीय ग्रंथालयात ‘ वाचक व्यासपीठ’ सारखे भरपूर उपस्थितीचे कार्यक्रम कसे होत व वाचन संस्कार त्यातून मोठ्या प्रमाणावर कसा होत होता यावर सविस्तर माहिती डॉ जोशी यांनी दिली.

रंजना पाठक यांनी अनुवादित केलेल्या सत्यजित रे यांच्या किशोर कथा संग्रहातील ‘ माकडांचे पूर्वज वानर’ या कथेचे सुंदर वाचन केले. तर कार्यवाह अनिल चनाखेकर यांनी पुस्तके मोफत उपलब्ध करून देणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

5 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

6 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

14 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

15 hours ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

1 day ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

2 days ago