📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 20, 2026
कविता

जागवा रे जागवा…

jagva-re-jagva-poem-by-shripad-bhalchandraj-joshi

तख्त राखणार ही
कोणाचे किती किती
दिल्लीच्या तख्तावर
बघू मराठी कधी

अमृताशी जिंकून पैजा
वाट्याला काय तिच्या
राज्य तिच्या नावाने
वाट्याला काय हिच्या

मिरवतो, फिरवतो
द्वाहीच फक्त तो
नावाने तिच्या
सत्ता जो भोगतो

तोंडदेखले तिचे
करून फक्त सोहळे
ठेऊनी गहाण तिजला
राज्य करणाराच निजला

मागू नका रे जोगवा
भीकही मागू नका
याचनाही फार झाली
वंचना साहू नका

जागवा रे जागवा
खदखदा हलवून यांना
मिळणार नाही मत एकही
ठणकावूनी सांगा तयांना

ऐकावयाला तितकीच येते
ही मराठी जयांना, भरभरून
देते जशी,दाखवा ना एकदा
काढूनही नेते कशी

होत हुजरेच नुसते
मुजरेच फक्त करू नका
तख्तही ते तयांचे
मराठी वाकवून मागते

ही मराठी आज अपुला
अधिकार आहे मागते
भीक नाही, आपले
तख्त आहे मागते

Related posts

अद्याक्षरावरून कविता विठ्ठल….

प्रेम चिरंतन…

येलीचा तोरा !!

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406