Cold Wave in Jeur; Cold-like Conditions in Jalgaon and Dahanu, says Ex-IMD Expert
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
थंडीची लाट-
जेऊर ला आज १० अंश से. इतके किमान तापमान नोंदवून तेथे थंडीची लाट अनुभवली गेली. हे किमान तापमान सरासरीपेक्षा जवळपास पाच डिग्रीने खालावलेले आहे. जेऊर चे कमाल तापमानही ३१ अंश से. नोंदवून सरासरीच्या २.१ अंश से.ने हे तापमान खालावलेले आहे.
थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती-
१०.५ अंश से. इतके किमान तापमान नोंदवून जळगांव मध्ये लाटेसदृश्य स्थिती आज दुसऱ्या दिवशीही जाणवली. हे किमान तापमान, सरासरीपेक्षा पाच प्लस इतक्या डिग्रीने खालावलेले आहे. कमाल तापमानही सरासरीच्या २.५ अंश से.ने घट होवून ३१ अंश से. इतके नोंदवले गेले. कोकणातील डहाणू येथेही आज जवळपास काहीशी थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती जाणवली.
उत्तर महाराष्ट्र उत्तर विदर्भात थंडी वाढण्याची शक्यता –
आज पासून महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगांव, नाशिक, छत्रपती संभाजी नगर व उत्तर अहिल्या नगर अश्या सहा जिल्ह्यांत सरासरीपेक्षा २ ते ४ डिग्रीने तर विदर्भात २ डिग्रीने किमान तापमान खालावून सप्ताहभर म्हणजे शनिवार दि. १५ नोव्हेंबर पर्यन्त चांगल्या थंडीची शक्यता जाणवते.
एका शेतकऱ्याचा प्रश्न – 👇
प्रश्न- अगोदर नगरला सर्वात कमी तापमान असायचे नंतर निफाड, जळगाव, मग आता जेऊर कसे?
माणिकराव खुळे – जेऊर हे करमाळा तालुका जिल्हा सोलापूर. नगर जिल्ह्याच्या सीमेवर लागून असलेले गांव असुन त्याची भौगोलिक रचना जवळपास अहिल्यानगर शहरासारखीच आहे. आज जेऊर ला सकाळी ०८:३० ला हवामान घटकांच्या निरीक्षणाची नोंद करतांना महाराष्ट्रात सगळ्यात कमी सापेक्ष आर्द्रता जेऊरला ५७ % नोंदली गेली आहे. तर परभणीला ५३ % नोंदली गेली आहे. सापेक्ष आर्द्रता हवेत सामावलेले पाण्याचे प्रमाण म्हणजेच हवेतील कोरडे पणा दर्शवते. सध्या ह्या तेथील कोरडेपणानेच तेथील पहाटे ५ चे किमान तापमान घटवले आहे.
एखाद्या ठराविक तापमानाला 👇
सापेक्ष आर्द्रता= (हवेत प्रत्यक्षात असलेल्या पाण्याच्या वाफेचे वजन ÷ त्या हवेत जास्तीत जास्त पाण्याची वाफ सामावू शकते, तिचे वजन ) X१००%
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…
हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…
विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…
स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…