विश्वाचे आर्त

ऋतंभरा प्रज्ञा कशास म्हणतात ?

ऋतम्भरा तत्र प्रज्ञा समाधिपाद सूत्र-४८

अध्यात्म – प्रसादाचा लाभ झाल्यानंतर जी प्रज्ञा (समाधीपासून लाभलेली बुद्धी) उत्पन्न होते, तिला ऋतंभरा प्रज्ञा म्हणतात.

या बुद्धीच्या ठिकाणी केवळ सत्य आणि सत्यच असते. भ्रम, गोंधळ,  विपरीत ज्ञान यांचा अजिबात गोंधळ नसतो.

अनुमान – अंदाज यांच्या मदतीने होणारे ज्ञान हे CONCEPTUAL FACT असते. तर ऋतंभरा प्रज्ञेतले ज्ञान हे PERCEPTUAL FACT असते.

समाधिपाद सूत्र-४९

श्रृत अनुमान प्रज्ञाभ्यां अन्यविषया विशेषार्थत्वात्.

आगम (शास्त्र) आणि अनुमानाच्या प्रज्ञेपेक्षा या (मागील सूत्रात सांगितलेल्या) प्रज्ञेचा विषय वेगळा आहे. कारण, त्या अवस्थेत (शब्द) अर्थाचा होणारा साक्षात्कार विशेष स्वरूपाचा असतो.

स्मृती शुद्ध होणे म्हणजे काय ?

समाधिपाद सूत्र-४२

तत्र शब्दार्थज्ञानविकल्पै:संकीर्णा सवितर्का समापत्ति:

या समापत्तींमध्ये शब्द, अर्थ आणि ज्ञानाच्या विकल्पाने मिश्रित असते, तेव्हा तिला सवितर्क समापत्ती असे म्हणतात. शब्द, शब्दांचा अर्थ यांमुळे होणारे स्पष्ट ज्ञान आणि त्यानंतरची ज्ञानग्रहणाची प्रक्रिया याला सवितर्क समापत्ती म्हणतात.

 समाधिपाद सूत्र-४३

स्मृतिपरिशुद्धौ स्वरूपशून्येवार्थमात्रनिर्भासा निर्वितर्का

स्मृती शुद्ध झाल्यावर, स्वरूपशून्य, अर्थमात्र वाटणारी निर्वितर्क समापत्ती प्राप्त होते.

स्मृती शुद्ध होणे म्हणजे शास्त्र, तर्क व ज्ञान या गोष्टींपासून मुक्त होऊन आपली नजर केवळ स्थूल रूपावर स्थिर होते. म्हणजेच तर्क-वितर्क या गोष्टी थांबतात. ज्या गोष्टी जशा असतात, तशा त्या स्वीकारायची क्षमता वाढते. याला निर्वितर्क समापत्ती असे म्हणतात. 

लेखन – प्रा. अ. रा. यार्दी, धारवाड.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

20 hours ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

1 day ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

2 days ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

3 days ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

3 days ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

4 days ago