शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सावधान ! बॉक्साईट खाणकाम प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचे शासनाचे प्रयत्न

कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा नव्याने बॉक्साईट खाणकाम प्रकल्पं सुरु करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. संपूर्ण पश्चिम घाट, तेथील पर्यावरण, जैवविविधता पुर्णपणे नष्ट झाल्यावरच अंमलबजावणी होईल, अशी आजची अवस्था आहे. ज्यांना खाणकाम प्रकल्पांना विरोध करायचा आहे. त्यांनी या आंदोलनात आमच्या बरोबर सहभागी होऊन योग्य सहकार्य करावे.

डॉ. मधुकर बाचूळकर, कोल्हापूर
मोबाईल – 97303 99668

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुका, पश्चिम घाट परिसरातील महत्वाचा पर्यावरणीय संवेदनशील तालुका असून, हा तालुका जैवविविधतेने अती समृद्ध आहे.या तालुक्यातील 51 गावे पर्यावरणीय संवेदनशील म्हणुन केंद्र शासनाने जाहीर केली आहेत पण यातील 13 गावे संवेदनशील यादीतून वगळावीत, अशी मागणी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे केली आहे, कारण राज्य शासनास, या गावांच्या हद्दीत बॉक्साईट खाणकाम प्रकल्पं सुरु करण्याची आहेत.

शाहुवाडी तालुक्यातील तीन ठिकाणी खाणकाम प्रकल्प सुरु करण्याबाबतची सुचना शासनाने प्रसिद्ध केली आहे, यापैकी एका प्रकल्पाची जनसुनावणी पार पडली आहे. पण ही जनसुनावणी फक्त एक फार्स होता. या प्रकल्पास विरोध करणाऱ्यां स्थानिक लोकांना शासकीय अधिकाऱ्यांनी ,जनसुनावणी वेळी बोलुच दिलं नाही, आणि सुनावणी फक्त दिड तासातच आटोपली. लोकांनी याबाबतची रितसर तक्रार जिल्ह्याधिकारी यांच्याकडे केली, पण त्यानी आवश्यक दखल घेतली नाही. कारण शासकीय अधिकाऱ्यांना ,राज्यकर्त्याच्या मर्जी प्रमाणे हे खाणकाम प्रकल्प रेटून न्यायचे आहेत‌.

आत्ता 6 जून रोजी सावरेवाडी येथे तर 9 जून रोजी परळी येथे खाणकाम प्रकल्पांच्या जनसुनावणी होणार आहेत. जुगाई मिनरल्स, व मल्हार मिनरल्स या कंपनी तेथे खाणकाम करणार आहेत. काही स्थानिक पर्यावरण प्रेमी लोक या प्रकल्पांना प्रखर विरोध करत आहेत. पण त्यांची संख्या जास्त नाही. पण तरीही ते संभाव्य पर्यावरणीय प्रश्न उपस्थित करुन विरोध करीत आहेत. पर्यावरण, जैवविविधता बाबतचे सर्व नियम ,कायदे धाब्यावर बसवून शासन व खाणकाम कंपन्या खाणकाम सुरू करण्यासाठी प्रयत्नशिल आहेत.

मी अगदी सुरवातीपासून खाणकाम प्रकल्पांना विरोध करीत आहे, सन 1997-99 या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व खाणकाम प्रकल्पं मी बंद पाडली होती. मी आजही प्रकल्प विरोधकांबरोबरच आहे. प्रयत्न सुरु आहेत. पण नेहमी प्रमाणे जिल्ह्यातील अभ्यासक, विषय तज्ञ , पर्यावरणप्रेमी मात्र मुग गिळून गप्प आहेत. सन 2010 पासून पश्चिम घाट संरक्षण ,संवर्धनासाठी केंद्र शासनाने गाडगीळ समिती ,कस्तुरीरंगन समिती नेमली, पण पंधरा वर्षे लोटली तरीही कशाचीच अंमलबजावणी झालेली नाही. केंद्र सरकारने इको सेन्सिटिव्ह झोनस बाबत आज अखेर सहा जाहीर सुचना ( नोटिफिकेशन ) काढल्या, पण अंमलबजावणी शुन्य.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

10 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

23 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago