📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 15, 2026
संशोधन आणि तंत्रज्ञान

डॉ. क्रांतीवीर मोरे यांची युवा वैज्ञानिक परिषदेसाठी निवड

“Dr. Krantiveer More selected for the Young Scientist Conference at IISF 2025 for his solar-energy nanotechnology research.”

कोल्हापूर – हरियाणातील पंचकुला येथे येत्या ६ ते ९ डिसेंबर या कालावधीत आयोजित इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल -२०२५ मधील युवा वैज्ञानिक परिषदेसाठी (यंग सायंटिस्ट कॉन्फरन्स) शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. क्रांतीवीर मोरे यांची निवड झाली आहे.

शिवाजी विद्यापीठाचे डॉ. क्रांतीवीर मोरे यांची सौरऊर्जा क्षेत्रातील नॅनोसंशोधन आणि उपकरणनिर्मितीबद्दल इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल 2025 मधील युवा वैज्ञानिक परिषदेसाठी निवड. यावर प्रतिक्रिया

डॉ. मोरे हे सौरऊर्जा क्षेत्राच्या अनुषंगाने संशोधन करीत आहेत. त्यांनी विविध प्रकारची नॅनोसंमिश्रे तयार केली असून त्यांच्यापासून कमीत कमी तापमानामध्ये आणि अत्यल्प वेळेत सौरऊर्जा उत्पादन करणारे उपकरण बनविले आहे. यामध्ये त्यांनी कॅडमियम सल्फाइड क्वांटम डॉट, नैसर्गिक रंग, टायटॅनियम डायऑक्साईड नॅनोमुलद्रव्यांचा वापर केला आहे. हे उपकरण सुलभपणे हाताळता येते. सौरऊर्जा क्षेत्रातील संशोधनाला चालना देणाऱ्या या संशोधनामुळेच डॉ. मोरे यांची या परिषदेसाठी निवड झाली आहे.

डॉ. मोरे यांचे वीसहून अधिक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित असून सहा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पेटंट त्यांच्या नावावर आहेत. त्यांना भारत सरकारकडून कॉपीराईटदेखील प्राप्त झाला आहे. याच वर्षी त्यांनी स्वतःची स्टार्टअप प्रशिक्षण कंपनी स्थापन केली असून विद्यापीठाच्या नवोन्मेष केंद्रात नोंदणी केली आहे.

इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलचे घोषवाक्य “आत्मनिर्भर भारत: विज्ञानातून समृद्धीकडे” असे असून देशातील वैज्ञानिक नवप्रतिभा, सर्जनशीलता यांना एकत्र आणून आंतरविद्याशाखीय संवाद आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहित करण्याचे उद्दिष्ट त्यामागे आहे. परिषदेत नामवंत वैज्ञानिक, नोबेल पुरस्कार विजेते तसेच प्रख्यात वैज्ञानिक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

Related posts

अग्नी : मानवाच्या संरक्षणाची पहिली शस्त्रकला

बंजारा समाजातील म्हणींचे सौंदर्य…

पाऊस, शेती आणि संघर्ष : मराठी ग्रामीण कादंबरीचा अभ्यासपूर्ण पट

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406