पर्यटन

Photos : निसर्गसंपन्न आंबोलीतील महादेवगड…

एकामागोमाग येणारी घुमावदार वळणे अन् नागमोडी रस्ते, हिरवेगार डोंगर त्यावर पसरलेली धुक्याची चादर, डोंगरावरून अविश्रांत कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि इथले आल्हाददायक वातावरण म्हणजे स्वर्गसुख.

दुर्गकन्या गिता खुळे

http://instagram.com/durg_kanya
दुर्गवारी,
डी सुभाष प्रोडक्शन

पश्चिम घाटातील जैवविविधतेचा दर्जा असलेलं आंबोली म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण. कोल्हापूर पासुन 120 किलोमीटरवर असणारे आंबोली, तिथलं हवामान तिथला पावसाळी निसर्ग म्हणजे भटक्यांसाठी पर्वणीच.

एकामागोमाग येणारी घुमावदार वळणे अन् नागमोडी रस्ते, हिरवेगार डोंगर त्यावर पसरलेली धुक्याची चादर, डोंगरावरून अविश्रांत कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि इथले आल्हाददायक वातावरण म्हणजे स्वर्गसुख. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांना जोडणारा हा महत्त्वाचा घाटमार्ग असुन पावसाळयात तो पर्यटकांनी गजबजलेला दिसतो. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या अनेक ठिकाणासोबत आंबोलीने ऐतिहासिक वारसा ही जपला आहे, तो म्हणजे महादेवगड.

आंबोली गावापासून ३ कि. मी. वर असणारा महादेवगड म्हणजे आंबोली भेटीतील खास ठिकाण. गडावर जाण्यासाठी डांबरी रस्ता असून गडाचा कातळ तिन्ही बाजूंनी तासून काढलेला आहे. गडाची समुद्रसपाटीपासून उंची ६४१ मीटर आहे. एकेकाळी गडाला तटबंदी, बुरुज आणि तटबंदी भोवती खंदक होते, पण सद्यस्थितीत गडावर दुर्दैवाने काहीच अवशेष शिल्लक नाही.

गडाच्या बांधणीचे श्रेय सावंतवाडी संस्थानाचे अण्णासाहेब फोंड सावंत यांना जाते. पूर्वीच्या काळी कोकणातील मालवण, वेंगुर्ला, रेड्डी इत्यादी बंदरात उतरणारा माल विविध घाट मार्गाने घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जाई. यापैकी पारपोली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी गडाची बांधणी करण्यात आली. गडाच्या पश्चिम दिशेला मनोहर मन संतोषगड दिसताे.

गडाच्या टोकापर्यंत चालत जाऊन तिथला निसर्ग अनुभवता येतो. त्यामुळे इथे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कठडे बांधले आहेत. गडाच्या टोकाशी उभे राहिले असता धुक्यात हरवलेला सह्याद्री दिसतो. पावसाळा ओसरला की हिरवी दुलई पांघरलेल्या या गडावर पिवळया फुलांचा साज चढतो. त्यावेळी दिसणारा गड, इथला भन्नाट वारा आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातो..

महादेवगड आणि निसर्गसंपन्न आंबोली व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

6 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

11 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

19 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

20 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

1 day ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

1 day ago