Maharashtra Heavy Rainfall Alert from August 16 to 20, 2025 – Konkan & Ghats at High Risk
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
उद्या शनिवार दि. १६ ऑगस्ट ते बुधवार दि. २० ऑगस्ट पर्यंतच्या पाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः कोकणातील मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड जिल्ह्यात व नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी, जुन्नर, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, महाबळेश्वर, जावळी, पाटण, शाहूवाडी, बावडा, राधानगरी, चंदगड तालुक्याच्या क्षेत्रात व लगतच्या परिसरात ह्या पाच दिवसात अधिक जोरदार पावसाची शक्यता जाणवते. त्यामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या नद्यांच्या पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याच्या विसर्गासह, धरणांच्या जलसाठ्याच्या टक्केवारीत ह्या आठवड्यात अधिक वाढ होण्याची शक्यता जाणवते.
पावसाची शक्यता कश्यामुळे ?
i) हवेच्या कमी दाब क्षेत्राचा मान्सूनचा आस त्याच्या सरासरीच्या जागेपासून दक्षिणेकडे सरकल्या मुळे
ii) बंगालच्या उपसागरात दक्षिण ओरिसा व उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टी दरम्यान ७.६ किमी. उंचीपर्यंतचे अस्तित्वात असलेले गोलाकार हवेचे कमी दाबाचे क्षेत्र व त्याची वायव्येकडे मार्गक्रमणाच्या शक्यतेमुळे
iii)अरबी समुद्रात ३.१ किमी. उंचीवरील चक्रीय वाऱ्याची स्थिती-
ह्यामुळे ह्या पाच दिवसात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
iv) ‘एमजेओ'(मॅडन ज्यूलियन ऑसिलेशन) ची वि.वृत्तीय मार्गक्रमणातील वारी सध्या भारतदेश समुद्रीय क्षेत्रातून १४ ते २० ऑगस्ट दरम्यान मार्गस्थ होत आहे. त्याची बळकटी दाखवणारा ‘आम्प्लिटुड’ हा एक च्या आसपास आहे.
‘एमजेओ’ च्या ह्या वारीचे जेंव्हा १४ ऑगस्टला अरबी समुद्रातून प्रयाण झाले, तेंव्हा मरगळलेला मान्सून सक्रिय झाला. तो सह्याद्रीचा घाट चढला. आणि घाटमाथ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात १४ ऑगस्टपासून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता निर्माण होत आहे.
एमजेओची ही वारी बंगालचा उपसागरात १७ ते १८ ऑगस्ट दरम्यान प्रवेशण्याची शक्यता असुन मान्सूनच्या बंगालचा उपसागरीय शाखेलाही त्यामुळे अधिक बळ मिळू शकणार आहे.
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…
हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…
विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…
स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…