शेती पर्यावरण ग्रामीण विकास

एनटीपीसी आरजीपीपीएल रत्नागिरी टाउनशिप ठरली आयजीबीसी नेट झिरो जल प्रमाणपत्र मिळविणारी भारतातील पहिली टाउनशिप

एनटीपीसी आरजीपीपीएल रत्नागिरी टाउनशिप ठरली आयजीबीसी नेट झिरो जल प्रमाणपत्र मिळविणारी भारतातील पहिली टाउनशिप

मुंबई – एनटीपीसीची रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायवेट लिमिटेड (आरजीपीपीएल) टाउनशिप भारतीय हरित बांधकाम परिषद (आयजीबीसी) नेट झिरो जल प्रमाणपत्र मिळविणारी भारतातील पहिली टाउनशिप ठरली आहे. हे यश एनटीपीसीच्या शाश्वतता आणि जल व्यवस्थापन पद्धतींमध्ये नेतृत्वाप्रती वचनबद्धतेची ग्वाही देते.

आरजीपीपीएल रत्नागिरी हा एनटीपीसीच्या पश्चिम विभाग-I (डब्ल्यूआर-I) चा भाग असून या प्रकल्पाने पर्जन्यजल संधारण, सांडपाण्याचा परिणामकारक पुनर्वापर आणि नवोन्मेषी तंत्रज्ञानाधारे पाणीवापरात कपातीसह शाश्वत जल व्यवस्थापन पद्धतींमध्ये अपवादात्मक प्रयत्नांचे दर्शन घडविले आहे. नेट झिरो जल प्रमाणपत्र मिळविण्यात टाउनशिपने प्राप्त केलेले यश एनटीपीसीची पर्यावरणीय भूमिका कारभारात आणून शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्याप्रती समर्पण अधोरेखित करते.

“आयजीबीसी निव्वळ शून्य जल प्रमाणपत्र आरजीपीपीएल रत्नागिरीने मिळविणे हा एनटीपीसीसाठी अभिमानाचा क्षण आहे आणि शाश्वततेप्रती आमच्या वचनबद्धतेची ग्वाही आहे. या यशाने ऊर्जा क्षेत्रात हरित पद्धतींसाठी उच्च मानक  प्रस्थापित केले असून एकात्मिक जल व्यवस्थापन शाश्वत भविष्याकडे नेण्यासाठी कसे साह्यभूत ठरते याचे उदाहरण आहे. अधिक हरित आणि स्वच्छ भारतात योगदान देण्यासाठी आम्ही नवोन्मेषी उपाययोजनांच्या निर्मितीसाठी कार्यरत राहू.”

कमलेश सोनी, प्रादेशिक कार्यकारी संचालक, पश्चिम विभाग-I, एनटीपीसी,

या प्रमाणपत्राने एनटीपीसीचे ऊर्जा क्षेत्रात शाश्वततेला प्रोत्साहनपर उपक्रम राबविणारे नेतृत्व म्हणून स्थान पक्के झाले आहे. जल संवर्धन आणि पर्यावरणीय जबाबदारीच्या राष्ट्रीय उद्दीष्टांशी आपली कार्यपद्धती जुळवून घेण्याबाबत एनटीपीसीचा सक्रीय दृष्टीकोन हे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे ठळकपणे समोर आला आहे.

एनटीपीसीचे डब्लूआर-I मधील आद्य प्रकल्प असलेल्या आरजीपीपीएल रत्नागिरी टाउनशिपने मिळविलेल्या प्रमाणपत्रामुळे कंपनीचा विकास आणि पर्यावरणीय जबाबदारीत संतुलन साधण्याचा, समुदाय आणि पर्यावरणासाठी दीर्घकालीन लाभ मिळविण्यासाठीचा निश्चय अधोरेखित झाला आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

३६ हजार बंद उद्योगांचे वास्तव!

विशेष आर्थिक लेख. महाराष्ट्रातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या गेल्या पाच वर्षांत बंद झाल्याची माहिती संसदेत…

3 hours ago

‘आभाळाच्या गावी’- बालसुलभ मनाचा काव्यात्म आविष्कार करणारी कविता

बालमन म्हणजे निरागस प्रश्नांचे,अनोख्या कल्पनांचे आणि छोट्या-छोट्या गोष्टींत आनंद शोधणाऱ्या कुतूहलाचे सुंदर विश्व. या विश्वाचा…

5 hours ago

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कारांची घोषणा

वैशाली पाटील, सीमा क्षीरसागर यांना शेती-पाणी पुरस्कार; चार मान्यवरांना साहित्य पुरस्कार मुंबई : यशवंतराव चव्हाण…

15 hours ago

यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराची नामांकन प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता आणि अंतिम मुदत

राष्ट्रीय एकात्मता, संवैधानिक मूल्ये आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्थांना संधी मुंबई :…

16 hours ago

सहाय्यक प्राध्यापक भरती पारदर्शक की पुन्हा ‘व्यक्तीनिष्ठ’? ५,००० हून अधिक पदांच्या प्रक्रियेवर संभ्रम का?

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रातील हजारो इच्छुक उमेदवारांसाठी सहाय्यक प्राध्यापक भरतीची प्रक्रिया ही आशेचा किरण ठरली…

1 day ago