Rang Pawasache Poetry Conference in Sakharale on 6 August
‘सा कला विमुक्तये !’ हे ब्रीद घेऊन साहित्य, नाट्य, संगीत अशा सर्व कलाक्षेत्रात काम करणाऱ्या संस्कार भारतीची पश्चिम प्रांत, सांगली जिल्हा समितीची साहित्य विधा आणि जिल्हा परिषद शाळा क्र.१ व २, साखराळे यांच्या वतीने ६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता जिल्हा परिषद शाळा साखराळे येथे ‘ रंग पावसाचे ‘ हे खुले कविसंमेलनाचे आयोजित करण्यात आलेले आहे.
ज्येष्ठ कवयित्री अस्मिता इनामदार (सांगली) या कविसंमेलनाचे संमेलनाध्यक्षपद भूषवणार असून प्रसिद्ध कवी व गझलकार विनायक कुलकर्णी (सांगली) हे या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. या संमेलनाला सन्मानीय अतिथी म्हणून साहित्यिक आणि तिळगंगा साहित्यरंग परिवार,पेठ चे अध्यक्ष मेहबूब जमादार, साखराळेच्या लोकनियुक्त सरपंच सुजाता जयकर डांगे
आणि उपसरपंच बाबुराव निवृत्ती पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
कवयित्री -गझलकार मनीषा रायजादे-पाटील या सूत्रसंचालन करणार असून कवयित्री सुनीता कुलकर्णी, कवी महादेव हवालदार, मुख्याध्यापिका उज्वला मोहन माने व गीता सदानंद इनामदार आणि संस्कार भारतीच्या सहसचिव प्रज्ञा भागवत कविसंमेलनाचे संयोजन करत आहेत. हे कविसंमेलन सर्व कवी-कवयित्री यांच्यासाठी खुले असून नामवंत व नवोदित कवी-कवयित्री यांनी आणि रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी भाग - ६ एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या प्रवासातील तेंगबोचेकडे जाणारा टप्पा म्हणजे हिमालयाच्या…
सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…
"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…