काय चाललयं अवतीभवती

अनिल धाकू कांबळी, ऐश्वर्य पाटेकर यांना रत्नाकर काव्य पुरस्कार

१८डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान समारंभ

कोल्हापूर – दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणाऱ्या २०२३ या वर्षातील राज्यस्तरीय रत्नाकर काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये अनिल धाकू कांबळी ( कणकवली ) यांच्या ‘ इष्टक , तर ऐश्वर्य पाटेकर ( नाशिक) यांच्या ‘कासरा’ या संग्रहांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून पुरस्कार प्रदान समारंभ १८ डिसेंबर,२०२४ रोजी होणार आहे.

पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी पाच हजार रुपये, गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. पुरस्कार निवडीसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे, ज्येष्ठ कवी भीमराव धुळुबुळू यांनी काम पाहिले. पुरस्कार प्रदान समारंभ येत्या १८ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणार आहे.

धम्मपाल रत्नाकर काव्य पुरस्कार यापूर्वी श्रीधर नांदेडकर, श्रीकांत देशमुख, वीरधवल परब, कल्पना दुधाळ, संजीवनी तडेगावकर, अरुण इंगवले, पी. विठ्ठल, सुरेश सावंत, अजय कांडर, सारिका उबाळे, सुचिता खल्लाळ, पद्मरेखा धनकर, दीपक बोरगावे, कविता मुरूमकर, हबीब भंडारे, गोविंद काजरेकर, राजेंद्र दास, केशव देशमुख, कीर्ती पाटसकर आदींना देण्यात आला आहे. समारंभास साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य सभेचे कार्याध्यक्ष दि. बा. पाटील, कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी केले आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

एनआयआरएफच्या नावाखाली गुण कपात; ग्रामीण विद्यार्थ्यांवर अन्याय ? Maharashtra Assistant Professor Recruitment

महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीसाठी लागू केलेल्या नव्या ६०:२०:२० मूल्यांकन पद्धतीत शैक्षणिक गुणांना विद्यापीठाच्या…

6 hours ago

देव सर्वत्र आहे, मग आपण पाहत का नाही ? god-is-everywhere-why-cant-we-see-him

तूं मन हें मीचि करी । माझां भजनी प्रेम धरीं ।सर्वत्र नमस्कारीं । मज एकातें…

1 day ago

गुरुपौर्णिमा : अंतर्याम्यातील गुरूचे चार उपदेश Gurupournima Special

गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ बाह्य गुरूंना वंदन करण्याचा दिवस नाही; तर आपल्या अंतर्याम्यातील विवेकगुरूचा आवाज ऐकण्याचाही…

1 day ago

आंतरभारती, विश्वभारती आणि ‘ज्ञानभारती’ – भारतीयत्वाच्या नव्या पर्वाची संकल्पना New Vision of Indianness

भारतीयत्वाचा पुढील अध्याय सत्ता किंवा सीमांवर लिहिला जाणार नाही; तो ज्ञानाच्या मुक्त प्रवाहावर लिहिला जाईल.…

2 days ago

शब्दांच्या सृजनातून समाज,संस्कृती आणि संवेदनांचा वेध घेणारा साहित्यप्रवास

साहित्य हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजमन घडवणारी,संस्कृती जपणारी आणि विचारांना दिशा देणारी सर्जनशील शक्ती…

2 days ago

जेन झीचा वणवा : सोशल मीडियातून उभे राहिलेले नव्या भारताचे युवा आंदोलन

स्टेटलाइन – सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या एका वादग्रस्त वक्तव्याने ठिणगी पडली आणि सोशल मीडियावरील असंतोषाने देशव्यापी…

3 days ago